शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

कामावर परिणाम

By admin | Updated: November 25, 2015 22:11 IST

मालेगाव : मित्र शोधताना पोलिसांची दमछाक

मालेगाव : येथील ग्रामीण पोलीस दलात ‘पोलीसमित्र’ शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नियमित कामांबरोबर तपास कामावर परिणाम झाल्याचे बोलले जाते. पोलीस महासंचालकपदी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या लौकिकास साजेल असे काम करण्यास सुरुवात केली. यात त्यांनी विभागाला शिस्त लावण्याबरोबरच पोलिसांपासून लांब गेलेल्या जनसामान्यांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा व त्यातून पोलिसांना मदत होऊन आवश्यक ती माहिती मिळावी या हेतूने ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत २०० ते २५० पोलीसमित्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशावर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र यात मालेगाव परिसरात अनेक अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांना पोलीसमित्र शोधताना अनेकांची मनधरणी करावी लागत आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य ही नसती ब्याद नको म्हणून लांब राहत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास घाबरतात. पोलिसांचे गुन्हेगारांशी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झाले आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक प्रकरणात माहिती देणाऱ्यांची नावे उघड झाली आहेत. त्यात काही मदत करणाऱ्यांवर आकसापोटी पोलीस अधिकाऱ्यांनी हकनाक गुन्हे दाखल केल्याचे तसेच काहींना तुरुंगात टाकल्याचे प्रकार घडलेले आहेत. अशा परिस्थितीत पोलीसमित्र मिळणार कसे? मिळालेच तर अधिकाऱ्यांविषयी खात्री नसल्याने कर्मचारीही हातचे राखून काम करीत आहेत. यात काहींना बळजबरीने मित्र बनविण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी मोहल्ला कमिटीचे नामकरण करण्यात आल्याचीही चर्चा आहे. अनेक पोलीस ठाण्यात असे अनेक मित्र तयार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी तयार केलेल्या मित्रांपैकी किती मित्र काम करतील हे येणारा काळच ठरवेल. या सर्वांचा परिणाम नियमित कामांबरोबरच तपास आदि पोलीस कामांवर झाला आहे. पोलीसमित्र ही संकल्पना साकार करण्यासाठी पोलिसी कारवाईची भीती नष्ट करून विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी पोलिसांनी कायद्याची भाषा सोडून सर्वसामान्य नागरिकांसारखे वागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)