शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:50 IST

शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंदनाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा दोन दिवसांत थेट १६.१ अंशावर पोहोचला. दक्षिण ...

ठळक मुद्दे‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :

शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंद

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा दोन दिवसांत थेट १६.१ अंशावर पोहोचला. दक्षिण भारतातून गोवामार्गे गुजरातकडे सरकणाºया ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्टÑात पावसाची तर उत्तर महाराष्टÑात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.सोमवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर होते. वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे उत्तर महाराष्टÑात काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून, थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो. ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून, दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ओखी वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरीक्षण केंद्राने वर्तविली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सूर्यप्रकाशही होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले. गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपूर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गानेरूप बदलले असून, आज जोरदार पावसाची शक्यतानाशिक : ‘ओखी’मुळे शहरावर ढग दाटले असून, हवामान खात्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त माहितीनुसार गुजरात-सौराष्टÑासह मुंबई आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, सौराष्टÑासह मुंबईमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला. पावसासोबत वादळी वाराही जोरात होता. संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनससह गेटवे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट या भागाला दीड तास पावसाने जोरदार झोडपले. मंगळवारी (दि.५) नाशिकसह पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्टÑात वाºयाचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. वाºयाचा वेग वाढून ७० कि.मी. प्रती तासही होऊ शकतो. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.