शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

निकालापाठोपाठ आता वादाचेही ‘प्रयोग’

By admin | Updated: December 7, 2015 23:56 IST

राजकारणाचा दावा : रंगकर्मींचा तीव्र आक्षेप

नाशिक : राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल लागल्यानंतर लगोलग वादाचेही ‘प्रयोग’ रंगू लागले आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सोमवारी जाहीर केलेल्या निकालावर ‘हयवदन’च्या चमूने आक्षेप घेतला असून, आपल्या नाटकाला केवळ राजकारणापोटी डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माय डिअर शुबी’चे दिग्दर्शक प्रशांत हिरे यांनीही निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे ‘या ही वळणावर’, आर. एम. ग्रुपचे ‘माय डिअर शुबी’, ‘मेनली अमॅच्युअर्स’चे ‘या वळणावर’ व क. का. ललित कला महाविद्यालयाचे ‘हयवदन’ या नाटकांत चुरस होती. ‘हयवदन’ अखेरपर्यंत पारितोषिकाच्या शर्यतीत होते; मात्र त्याला डावलण्यात आल्याची चर्चा आज रंगली होती. ‘हयवदन’चे दिग्दर्शक रोहित पगारे यांनीही निकालावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निकालात एकतर राजकारण झाले आहे वा परीक्षकच त्या कुवतीचे नव्हते. आमच्यापेक्षा उत्तम दर्जाचे नाटक झाले असते आणि आम्हाला पारितोषिक मिळाले नसते, तर आमचे काही म्हणणे नव्हते; मात्र तसे नसताना शेवटच्या क्षणी नाटकाला डावलण्यात आले. अनेक महिन्यांपासून प्रचंड मेहनतीने नाटक साकारले. नाटकातील कलावंत नवे असूनही त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले; मात्र हेतुपुरस्सर डावलल्याने नवीन कलावंतांनी कामे करावीत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या स्पर्धांत असे राजकारण होत राहिल्यास नव्यांना प्रोत्साहन कसे मिळेल, असा प्रश्नही पगारे यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)

शासनाला कळवणारकिमान तिसरा क्रमांक तरी मिळेल, अशी अपेक्षा होती. या निकालाविरोधात उद्या संस्थेच्या वतीने पत्र काढणार असून, शासनाकडेही आक्षेप नोंदवणार आहोत. अशा प्रकारचे निकाल लागले, तर नवीन मुले नाटकाकडे वळणारच नाहीत. - रोहित पगारे,दिग्दर्शक, हयवदन