शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नाशिकमध्ये दुकानांबरोबरच दुध विक्रीच्या वेळेवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:41 IST

नाशिक : कोरोना आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी, संचारबंदी आदेशही लागू केले गेले आहेत. शहरात मंगळवारी (दि.२१) याबाबत काहीशी विरुद्ध स्थिती निर्माण झाली. नाशिककरांनी लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेत रस्त्यावर येत विविध भागात खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या वेळेबाबत शिथील केलेले निर्बंध पुन्हा कडक कररण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुक्त संचार टाळण्यासाठी कार्यवाहीजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

नाशिक : कोरोना आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी, संचारबंदी आदेशही लागू केले गेले आहेत. शहरात मंगळवारी (दि.२१) याबाबत काहीशी विरुद्ध स्थिती निर्माण झाली. नाशिककरांनी लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेत रस्त्यावर येत विविध भागात खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या वेळेबाबत शिथील केलेले निर्बंध पुन्हा कडक कररण्यात आले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात भाजीपाला, फळे, किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणे आणि विक्री करणे यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेचे बंधन राहील. तसेच किरकोळ दूध विक्रीकरिता सकाळी ६.०० ते ७.३० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत परवानगी राहील. यावेळे व्यतिरिक्त आस्थापनासुद्धा पूर्णपणे बंद राहतील. वैद्यकीय सेवा, वैद्यकीय आस्थापना आणि मेडिकल स्टोअर्स यांकरिता हे प्रतिबंध लागू असणार नाहीत, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

पुढील लॉकडाउन कालावधीत प्रतिबंधित असणाºया बाबी आणि सूट दिलेल्या बाबी याबाबत विविध अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. यानुसार शहरासह जिल्ह्यात कन्टेन्मेन्ट झोन जाहीर केले गेले आहेत. या झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण यापूर्वी आढळून आले आहेत, त्यामुळे अशा झोनमध्ये समाविष्ट होणाºया भागात कुठल्याही प्रकारची सूट व सवलत कोणत्याही अस्थापनांना लागू असणार नाही तसेच ज्या परिसरात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येतील त्या भागात नव्याने कन्टेन्मेन्ट झोन जाहीर केले जाईल आणि त्यानंतर तेथेही याच पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे रुतलेले अर्थचक्र फिरविण्यासाठी सरकारने सोमवार (दि. २१) पासून लॉकडाउन काहीसा सैल करण्याचा प्रयत्न करत आपापल्या कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत कारखाने व काही आस्थापना सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. लॉकडाउनबाबत नागरिकांनी गैरसमज करून न घेता विनाकारण घराबाहेर येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून नवीन सुधारित आदेशदेखील काढण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीही मंगळवारी याबाबत स्पष्टीकरण देणारे आदेश नव्याने पारित केले.

या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी परस्पर संपर्क होऊन संसर्ग वाढू नये, म्हणून लॉकडाउनला केंद्र सरकारच्या आदेशानुसार ३ मेपर्यंत मुदतवाढ देणेत आलेली आहे तसेच काही आस्थापना सुरू करणेबाबत अटी व शर्ती घालून देत सवलत देण्यात आली आहे, मात्र नागरिकांनी याचा कुठल्याही प्रकारे चुकीचा अर्थ काढून विनाकारण लॉकडाउनला बाधा निर्माण करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध साथरोग प्ररिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मांढरे यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी