शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:47 IST

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.शालेय पोषण आहाराचा मुद्दा गेल्या बैठकीत चर्चिला जावूनही या बैठकीत तो विषयपत्रिकेत आला नाही, यावरुन भाजपाचे पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जगताप यांनी बैठकीत जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे, भाजपा गटनेते विजय गडाख, सदस्य सुमन बर्डे, वेणुबाई डावरे, रविंद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, राहिणी कांगणे, शोभा बर्के, योगिता कांदळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सबंधीत अधिकाºयांनी मनमानी करत हा विषय त्यातून वगळल्याने भाजपा सद्स्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शालेय पोषण आहार हा विषय किरकोळ नसून जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा असल्याचे सदस्य रवींद्र पगार यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे गटनेते कातकाडे यांनी मध्यस्थी करत नजरचुकीने विषय राहिला असेल तर अधिकाºयांनी आपली चूक मान्य करावी तसेच सदर विषयावर सभागृहात चर्चा करावी असे सांगितल्याने भाजप सदस्यांचे समाधान झाले.पाणीपुरवठ्याच्या विषयावर चर्चा करतांना बारागावपिंप्रीसह ७ गाव पाणीपुरवठा योजनेत ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सबंधीत अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी सूचना उपसभापती भाबड यांनी मांडली. वावीसह ११ गावे योजनेत देखील लक्ष घाला असे सदस्य पगार यांनी सांगीतले. सभेला विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहतात. आपला तालुका जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका आहे. आपल्याच तालुक्यात अधिकारी अशाप्रकारे मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे मत गटनेते विजय गडाख यांनी मांडले.बैठकीत वनविभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, विजवितरण विभाग, आरोग्य यासह विविध विभागांच्या योजना आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी