शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:47 IST

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.शालेय पोषण आहाराचा मुद्दा गेल्या बैठकीत चर्चिला जावूनही या बैठकीत तो विषयपत्रिकेत आला नाही, यावरुन भाजपाचे पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जगताप यांनी बैठकीत जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे, भाजपा गटनेते विजय गडाख, सदस्य सुमन बर्डे, वेणुबाई डावरे, रविंद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, राहिणी कांगणे, शोभा बर्के, योगिता कांदळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सबंधीत अधिकाºयांनी मनमानी करत हा विषय त्यातून वगळल्याने भाजपा सद्स्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शालेय पोषण आहार हा विषय किरकोळ नसून जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा असल्याचे सदस्य रवींद्र पगार यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे गटनेते कातकाडे यांनी मध्यस्थी करत नजरचुकीने विषय राहिला असेल तर अधिकाºयांनी आपली चूक मान्य करावी तसेच सदर विषयावर सभागृहात चर्चा करावी असे सांगितल्याने भाजप सदस्यांचे समाधान झाले.पाणीपुरवठ्याच्या विषयावर चर्चा करतांना बारागावपिंप्रीसह ७ गाव पाणीपुरवठा योजनेत ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सबंधीत अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी सूचना उपसभापती भाबड यांनी मांडली. वावीसह ११ गावे योजनेत देखील लक्ष घाला असे सदस्य पगार यांनी सांगीतले. सभेला विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहतात. आपला तालुका जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका आहे. आपल्याच तालुक्यात अधिकारी अशाप्रकारे मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे मत गटनेते विजय गडाख यांनी मांडले.बैठकीत वनविभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, विजवितरण विभाग, आरोग्य यासह विविध विभागांच्या योजना आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी