शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:47 IST

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.शालेय पोषण आहाराचा मुद्दा गेल्या बैठकीत चर्चिला जावूनही या बैठकीत तो विषयपत्रिकेत आला नाही, यावरुन भाजपाचे पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जगताप यांनी बैठकीत जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे, भाजपा गटनेते विजय गडाख, सदस्य सुमन बर्डे, वेणुबाई डावरे, रविंद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, राहिणी कांगणे, शोभा बर्के, योगिता कांदळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सबंधीत अधिकाºयांनी मनमानी करत हा विषय त्यातून वगळल्याने भाजपा सद्स्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शालेय पोषण आहार हा विषय किरकोळ नसून जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा असल्याचे सदस्य रवींद्र पगार यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे गटनेते कातकाडे यांनी मध्यस्थी करत नजरचुकीने विषय राहिला असेल तर अधिकाºयांनी आपली चूक मान्य करावी तसेच सदर विषयावर सभागृहात चर्चा करावी असे सांगितल्याने भाजप सदस्यांचे समाधान झाले.पाणीपुरवठ्याच्या विषयावर चर्चा करतांना बारागावपिंप्रीसह ७ गाव पाणीपुरवठा योजनेत ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सबंधीत अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी सूचना उपसभापती भाबड यांनी मांडली. वावीसह ११ गावे योजनेत देखील लक्ष घाला असे सदस्य पगार यांनी सांगीतले. सभेला विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहतात. आपला तालुका जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका आहे. आपल्याच तालुक्यात अधिकारी अशाप्रकारे मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे मत गटनेते विजय गडाख यांनी मांडले.बैठकीत वनविभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, विजवितरण विभाग, आरोग्य यासह विविध विभागांच्या योजना आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी