धरणांतून पाणी देण्यास विरोधदेवळा : सर्वपक्षीय कृती समितीची बैठकदेवळा : कसमादेसाठी वरदान ठरणाऱ्या चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर धरणांतील असलेले पाणी कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव या तालुक्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पुरेसे नसताना जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे गिरणा डॅम भरण्यासाठी पाणी पळविण्याचा घाट घातला आहे. यास देवळा येथे झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याचा आधार घेत ह्या धरणातील पाणी गिरणा डॅम भरण्यासाठी पळविण्याचा घातलेला घाट कदापिही यशस्वी होऊ देणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी सागितले. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या हक्काच्या पाण्याची पळवाट न होता कसमादेच्या पिण्याच्या व शेतीच्या उद्योगासाठी त्यांचे नियोजन व्हावे याबाबत २१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, कृती समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना भूमिका समजावून सांगण्यात येणार आहे. १ डिसेबर रोजी प्राधिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीच्या होणाऱ्या बैठकीत सदर याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यासाठी केदा अहेर कसमादेतील लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहेत. त्यात योेग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचे संकेत कृती समितीकडून देण्यात आले आहेत.यावेळी समितीचे अध्यक्ष के. एन. अहिरे, माजी आमदार संजय चव्हाण, विलास बच्छाव, योगेश अहेर, हेमंत पाटील, अशोक थोरात, कैलास बोरसे, लालचंद सोनवणे, केदा शिरसाठ, गोविंद पगार, शक्ती दळवी, अरविंद सोनवणे, गजेंद्र चव्हाण, धनंजय पवार, विजय पगार, राजेंद्र अहिरे यांच्यासह कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यांतील सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)
धरणांतून पाणी देण्यास विरोध
By admin | Updated: November 16, 2015 00:32 IST