शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

लष्कराच्या भुसंपादनास विरोध

By admin | Updated: August 30, 2015 22:17 IST

लष्कराच्या भुसंपादनास विरोध

इगतपुरी : तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यातघोटी : इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आल्या आहे.अनेक प्रकल्पग्रस्थांना योग्य भरपाई मिळालेली नाही.त्यातच आता उर्विरत जमिनींपैकी तीन गावांतील २२९ हेक्टर बागायती जमीन लष्कराच्या प्रकल्पासाठी जिल्हाधिकार्यांकडून संपादन करण्यासाठी युध्द पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत.यासाठी प्रखर विरोध करण्यात येईल व प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल पण आमच्या तीन गावांतील जमीन संपादन करू देणार नसल्याची भूमिका इगतपुरी पंचायत समतिीचे उपसभापती पांंडुरंग वारु ंगसे यांच्यासह तीन गावांतील शेतकर्यांनी घेतली आहे.या संपादनाला प्रसंगी न्यायालयात जावून कडाडून विरोध करणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव,बेलगांव तर्हाळे, गंभीरवाडी या तीन गावांतील २२९ हेक्टर बागायती जमीन संपादन करण्यासाठी देवळाली कॅम्पच्या आर्टिलरी सेंटरकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरसाठी युद्धाचा सराव करण्यासाठी तसेच मैदानी गोळीबार आण ितोफखाना सरावासाठी भू संपादन प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे.पिहल्या टप्प्यात बेलगांव तर्हाळे, धामणगाव, गंभीरवाडी या तीन गावांतील २२९ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.दुसर्या टप्प्यात काही लगतच्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार संपादन करण्यात येणार आहे.लष्करी अधिकार्यांनी याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेला आहे. त्यानुसार संपादनाची प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. ही तिन्ही गावे अधिसूचित क्षेत्रातील असल्याकारणाने भू-संपादन करण्यापूर्वी त्या त्या गावांतील ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे ठराव आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी लष्कराला कळवले आहे. भू संपादनाच्या नविन कायद्यातील कलम ?? नुसार ग्रामसभेत मंजूरी मिळणे आवश्यक आहे.लष्करी अधिकार्यांनी या तीन गावांत तात्काळ ग्रामसभा घ्यावी असे पत्र आज ग्रामपंचायतींना दिले.दरम्यान लष्कराच्या या प्रस्तावित भू संपादनामुळे शेकडो शेतकरी कायमचे भुमीहीन होणार आहेत. या पाशर््वभूमीवर तिन्ही गावांतील शेतकर्यांनी तीव्र विरोध करण्यासाठी मोर्चेबांधनी केली आहे. इगतपुरी पंचायत समतिीचे उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. काहीही झाले तरी या तिन्ही गावांतील एक इंच जमीनही संपादित होवू देणार नसल्याची भूमिका वारु ंगसे यांनी घेतली आहे. बेलगांव तर्हाळेच्या सरपंच ललिता बेंडकोळी, धामणगावचे सरपंच राधाबाई बांबळे, उपसरपंच निवृत्ती जाधव,माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे,रामदास वारु ंगसे, बाळकृष्ण वारु ंगसे,पंढरीनाथ वारु ंगसे, पूंजाभाऊ गाढवे, पांडुरंग गाढवे,नामदेव गाढवे, नंदु गाढवे,हिराबाई तातळे, मिराबाई ढवळेआदिंसह सर्व शेतकरी संतप्त झाले असून या विरोधात लढा देण्याच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)हजारो हेक्टर जमिनींचे संपादन

इगतपुरी तालुक्यात १९४० पासून लष्कर, धरणे, विज प्रकल्प, रस्ते,रेल्वे,औद्योगिकरण यासाठी हजारो हेक्टर जमिनींचे मोठ्या प्रमाणावर संपादन करण्यात आले आहे.नागपुर-मुंबई महामार्गासाठीही अनेक जमीनी संपादनाच्या वाटेवर आहेत.अनेक शेतकरी या कारणांमुळे कायमचे भूमिहीन झालेले आहेत.काहींना ह्या जमिनींचा अत्यल्प मोबदला मिळालेला असून अधिक मोबदल्यासाठी अनेक पातळ्यांवर कायदेशीर लढाया सुरु आहेत.