शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजीनामा क्रमांक. ३; मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनाम्याचा फार्स, केवळ समर्थनाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:33 IST

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे नाशिक जिल्ह्यातील पहिले आमदार ठरणार आहे.

नाशिक :  जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल अहेर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांना मराठा आरक्षणाच्या समर्थनाचं पत्र दिलं आहे. हे पत्र म्हणजेच आपल्या आमदारकीचा राजीनामा असंही ते म्हणाले आहेत. परंतु, त्यांनी अद्याप विधानसभा अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांप्रमाणेच  विधानसभा अध्यक्षांकडेही राजीनामा दिला तर ते मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे नाशिक जिल्ह्यातील पहिले आमदार ठरणार आहे. राहुल अहेर यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना आपल्या पाठिंब्याचे पत्र देतानाच मराठा आरक्षणासाठी आपण पाठिंबा देत असून हे आपल्या राजीनाचे पत्र समजावे असे स्पष्ट केले आहे.

राज्यभरात मराठा समाजाचे आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी आमदारकीचे राजीनामे दिले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होताना राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. सरकारने अध्यादेश न काढल्यास राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले होते. सरकारने अध्यादेश न काढल्याने घोषणा केल्याप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेलने आपला राजीनामा पाठवला आहे.

तर वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनीही मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे तसेच काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीमुळे व्यथित होऊन आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पैठण येथील आमदार संदिपान भुमरे यांनीही राज्य सरकारने मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तातडीने आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असताना नाशिक जिल्हयातूनही मराठा आमदारांवर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात असताना राहूल अहेर यांनी मराठा क्रांती मोचार्च्या समन्वयकांना आपल्या राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले असून आता ते विधानसभा अध्यक्षांना राजीनामा कधी सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.