शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या

By admin | Updated: August 5, 2014 01:53 IST

रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या

 

नाशिक : जुन्या नाशकातील काझी गढीच्या धोकेदायक काठालगतच्या दोनशे कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार असून, गढीचा भुसभुशीत झालेला भाग ढासळत चालला आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवासी संतप्त झाले असून, आज सकाळी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.धोकेदायक झालेल्या काझी गढीचा काही भाग गेल्या सहा दिवसांपूर्वी कोसळल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून स्थलांतर करण्याचा तगादा लावला जात असून, काठालगतच्या कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेकडून कमी घरे दिली जात असून, जुन्या घरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही लेखी हमी मनपा देण्यास तयार नसून गढीला संरक्षक भिंत बांधून देण्याबाबतही प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे स्थलांतर करून आमच्यावर बेघर होण्याची वेळ येईल; त्यापेक्षा मृत्यू परवडला, अशा भावना येथील महिलांनी बोलून दाखविल्या. दरम्यान, गेल्या रविवारप्रमाणे आजदेखील येथील काझी गढी रहिवाशांनी धोकेदायक झालेल्या गढीच्या काठावरच सकाळपासून भर पावसात ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आजदेखील महापौर किंवा अन्य अधिकारी गढीवर फिरकले नसल्यामुळे मनपा प्रशासन आम्हा रहिवाशांची मृत्यूच्या दरीत जाण्याची वाट बघत आहे, त्यांना येथील रहिवाशांच्या जिवाची पर्वा नाही, असा गंभीर आरोप सुरेश कुमावत, कैलास काथवटे, दशरथ कदम, पंकज रहाणे, संजय शिंदे, चंद्रकला नागपुरे, वैशाली खोडके, सुलोचना वारे, रंजना काथवटे, संगीता जाधव यांच्यासह इतर महिलांनी केला आहे. (प्रतिनिधी)