शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

धरणांच्या पाण्याचे आज आरक्षण

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

पोलीस बंदोबस्त : विरोधक आक्रमक

नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे पिण्यासाठी तसेच उद्योग व सिंचनासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता शनिवारी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जायकवाडी धरणासाठी गंगापूर, दारणा समूहातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेता त्याचे पडसाद या बैठकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनालाही या विरोधाची भीती वाटू लागल्याने बैठक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर येत आहेत व त्यातही त्यांनी पाण्याच्या आरक्षण निश्चितीसाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलविली आहे. जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंगापूर व दारणा धरण समूहांतर्गत येणाऱ्या गावांना नजीकच्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून, शेतीसाठी आवर्तनच मिळणार नसल्याने शेतकरी आत्तापासूनच हवालदील झाले आहेत. या साऱ्या परिस्थितीस राज्य सरकार व पर्यायाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. जलसंपदामंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या खात्यावरच सारा रोष असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून बैठकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.