शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

निवेदन : मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा देण्याची मागणी सिन्नर तहसीलवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:41 IST

सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसंशयितास फाशीची शिक्षा व्हावीजातीचे दाखले मिळाले पाहिजेत

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव, पवन सोनवणे, विजय बर्डे, किरण मोरे, संजय पवार, वैभव सोनवणे, रतन सोनवणे, नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असली तरी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व संशयितास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सिन्नर व निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, आदिवासी बांधवांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व विंचूरदळवी येथील प्रकरणात अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून आदिवासी समाजबांधवांच्या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत गणेशपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातून हजारो आदिवासी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा झाली.आदिवासी समाजावर अन्याय झाल्यानंतर कोणीही राजकारणी पुढे येत नसल्याची खंत उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. शासन जातीयवादी नसेल तर सदर खटला तातडीने जलद न्यायालयात चालविला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर...लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढून शासन दरबारी जाब मागण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले; मात्र न्याय मिळणार नसेल तर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल. विंचूरदळवीच्या तपासात त्रुटी राहता कामा नये. आदिवासी बांधव शिक्षण व बुद्धिमत्तेची लढाई एकवेळ हारतील; मात्र दोन हाताच्या लढाईत आदिवासी समाज आजपर्यंत हरला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४-५ दिवसात या मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथे मोर्चा काढण्याचा इशारा ढवळे यांनी दिला. त्यानंतर मुंबई येथे मोर्चासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असे ढवळे यांनी सांगितले.