शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

निवेदन : मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा देण्याची मागणी सिन्नर तहसीलवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:41 IST

सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसंशयितास फाशीची शिक्षा व्हावीजातीचे दाखले मिळाले पाहिजेत

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव, पवन सोनवणे, विजय बर्डे, किरण मोरे, संजय पवार, वैभव सोनवणे, रतन सोनवणे, नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असली तरी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व संशयितास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सिन्नर व निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, आदिवासी बांधवांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व विंचूरदळवी येथील प्रकरणात अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून आदिवासी समाजबांधवांच्या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत गणेशपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातून हजारो आदिवासी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा झाली.आदिवासी समाजावर अन्याय झाल्यानंतर कोणीही राजकारणी पुढे येत नसल्याची खंत उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. शासन जातीयवादी नसेल तर सदर खटला तातडीने जलद न्यायालयात चालविला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर...लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढून शासन दरबारी जाब मागण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले; मात्र न्याय मिळणार नसेल तर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल. विंचूरदळवीच्या तपासात त्रुटी राहता कामा नये. आदिवासी बांधव शिक्षण व बुद्धिमत्तेची लढाई एकवेळ हारतील; मात्र दोन हाताच्या लढाईत आदिवासी समाज आजपर्यंत हरला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४-५ दिवसात या मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथे मोर्चा काढण्याचा इशारा ढवळे यांनी दिला. त्यानंतर मुंबई येथे मोर्चासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असे ढवळे यांनी सांगितले.