शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

निवेदन : मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा देण्याची मागणी सिन्नर तहसीलवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:41 IST

सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसंशयितास फाशीची शिक्षा व्हावीजातीचे दाखले मिळाले पाहिजेत

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव, पवन सोनवणे, विजय बर्डे, किरण मोरे, संजय पवार, वैभव सोनवणे, रतन सोनवणे, नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असली तरी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व संशयितास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सिन्नर व निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत, आदिवासी बांधवांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व विंचूरदळवी येथील प्रकरणात अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळ्यापासून आदिवासी समाजबांधवांच्या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत गणेशपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यातून हजारो आदिवासी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा झाली.आदिवासी समाजावर अन्याय झाल्यानंतर कोणीही राजकारणी पुढे येत नसल्याची खंत उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष लकी जाधव यांनी व्यक्त केली. आदिवासी समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. शासन जातीयवादी नसेल तर सदर खटला तातडीने जलद न्यायालयात चालविला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.सनदशीर मार्गाने प्रश्न सुटत नसेल तर...लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आदिवासी समाजबांधवांनी मोर्चा काढून शासन दरबारी जाब मागण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले; मात्र न्याय मिळणार नसेल तर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्यात येईल. विंचूरदळवीच्या तपासात त्रुटी राहता कामा नये. आदिवासी बांधव शिक्षण व बुद्धिमत्तेची लढाई एकवेळ हारतील; मात्र दोन हाताच्या लढाईत आदिवासी समाज आजपर्यंत हरला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४-५ दिवसात या मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथे मोर्चा काढण्याचा इशारा ढवळे यांनी दिला. त्यानंतर मुंबई येथे मोर्चासाठी समाजबांधवांनी तयार राहावे, असे ढवळे यांनी सांगितले.