शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: February 25, 2016 22:08 IST

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची मोठी लागवड झाली असून, सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार झाला आहे. शासनाने हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.नाशिक जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात तब्बल ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमालाचे भाव, शेतीविषयक चुकीचे धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून शासनाने कांदा खरेदी करावा, कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रु पये भाव द्यावा, रब्बी कांद्याची देशात मोठी लागवड असल्याने इतर देशांबरोबर लवकरात लवकर करार करावे, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, हरणबारी धरणाचे डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित सुरू करावे, मोसम, आरम, गिरणा नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळींब उत्पादकांना २०१४ ते २०१६ पर्यंतचे दुष्काळी पॅकेज मिळावे आदि मागण्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले पाटील, नितीन रोठे पाटील, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, अण्णा शेवाळे, निवृत्ती खालकर, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब कातकाडे, अरुण शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)