ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे ग्रामसभेत कृषी सहाय्यकाच्या बदलीचा ठराव करण्यात आला. येथील कृषी सहाय्यकांनी गारपीटग्रस्तांचे चुकीचे पंचनामे केले असून, शेतकर्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती पुरविली जात नसल्याने येथील कृषी सहाय्यकाची बदली करावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजापूर येथील सरपंच दत्तू दराडे होते. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात अकरा महिने कराराने व्यवसायासाठी जागा घेतलेल्या व्यावसायिकांनी करपट्टी भरावी, नवीन नळ कनेक्शन, रस्त्याची दुरुस्ती, रोहयोअंतर्गत विहीर, शेततळ्याची कामे चालू करावी. दोन रुपये किलो धान्याची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावावी आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भारत वाघ, पोपट आव्हाड, सीताराम विंचू, विठ्ठल मुंढे, विजय सानप, मारुती बोडखे, विजय धात्रक, रामदास जाधव, पुंडलीक विंचू, अशोक मुंढे, सुभाष वाघ, अशोक सोनवणे आदि ग्रामस्थ हजर होते.
कृषी सहाय्यकाच्या बदलीचा ठराव
By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST