शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

By admin | Updated: July 4, 2017 00:37 IST

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात जून महिन्यात पावसाने दमदार लावलेली हजेरी अद्याप कायम असली तरी बागलाण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. महिनाभरात साधारणत: शंभर मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू करण्यास अनुमती असल्याने ४९ वाड्या व ५६ गावांमधील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी होऊ लागल्याने प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत.सदरचे टॅँकर सुरू ठेवावेत, असा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहेत. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच गेल्या वर्षापेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब जिल्हा प्रशासन अद्यापही मानायला तयार नसल्याने त्यांची खात्री करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागास पत्र देऊन जिल्ह्णातील पाण्याच्या पातळीचा अहवाल मागविला आहे. या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.