शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

By admin | Updated: July 4, 2017 00:37 IST

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात जून महिन्यात पावसाने दमदार लावलेली हजेरी अद्याप कायम असली तरी बागलाण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. महिनाभरात साधारणत: शंभर मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू करण्यास अनुमती असल्याने ४९ वाड्या व ५६ गावांमधील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी होऊ लागल्याने प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत.सदरचे टॅँकर सुरू ठेवावेत, असा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहेत. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच गेल्या वर्षापेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब जिल्हा प्रशासन अद्यापही मानायला तयार नसल्याने त्यांची खात्री करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागास पत्र देऊन जिल्ह्णातील पाण्याच्या पातळीचा अहवाल मागविला आहे. या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.