शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

By admin | Updated: July 4, 2017 00:37 IST

टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात जून महिन्यात पावसाने दमदार लावलेली हजेरी अद्याप कायम असली तरी बागलाण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. महिनाभरात साधारणत: शंभर मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू करण्यास अनुमती असल्याने ४९ वाड्या व ५६ गावांमधील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी होऊ लागल्याने प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत.सदरचे टॅँकर सुरू ठेवावेत, असा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहेत. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच गेल्या वर्षापेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब जिल्हा प्रशासन अद्यापही मानायला तयार नसल्याने त्यांची खात्री करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागास पत्र देऊन जिल्ह्णातील पाण्याच्या पातळीचा अहवाल मागविला आहे. या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.