शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नूतनीकरण झाले, वाद कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:58 IST

शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी आरेखन झाले आणि निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुमारे सहा महिने कलामंदिर बंद होते, त्यानंतर ते सुरू झाले. त्यातील रंगसंगती आणि सुविधा बघून सारेच भारावले, परंतु नंतर मात्र अनेक समस्या जाणवू लागल्या. हायटेक ध्वनी यंत्रणेचे महापालिकेला संचलन होईना. नूतनीकरण म्हणजे जणू नवी इमारत बांधली अशा थाटात नवा गडी नवा राज सुरू झाले आणि महापालिकेने त्यासाठीच नियमावलीच बदलली आहे. कामकाज सुलभ असेल तर कोणत्याही वास्तुला प्रतिसाद मिळतो, परंतु असे प्रत्यक्षात झालेले नाही. तांत्रिक सुविधांची हाताळणी, प्रत्येक सेवा सशुल्क या बरोबरच भाडेवाढीचा विषय गेल्या वर्षभर गाजला अन् त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी नाट्य व्यावसायिक आणि कलावंत मात्र समाधानी नाहीत. त्यामुळे गेल्याच महिन्यात या साऱ्यांनी पुन्हा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली.वास्तविक अनेक गोष्टी लहानसहान आहेत त्याचे निराकरण झाले तरी कलावंतांची नाराजी दूर होऊ शकेल, परंतु जे नियमात आहे त्या पलीकडे जाऊन व्यावसायिकांची अपेक्षा असल्याचे यापूर्वीही तत्कालीन अधिकाºयांचे मत होते. तर कलावंतांवर अन्याय म्हणजे कला आणि संस्कृतीवर अन्याय अशाप्रकारची भावना कलाकार व्यक्त करीत आहेत. त्यातच नूतनीकरण केल्यानंतर ज्या प्रमाणात उत्पन्न हवे होते, त्या तुलनेत ते मिळाले नाही. उलट वीस लाखांंनी उत्पन्न घटले आहेत. आयुक्तांनी याबाबत संबंधित अधिकाºयांकडे जाब विचारला असला तरी त्याचे उत्तर देण्यासाठी कालिदास कलामंदिराकडे पूर्ण व्यवस्थापक आहेच तरी कोठे?कालिदासचे नूतनीकरण झाले आणि स्मार्ट कालिदास म्हणजे उद्दिष्टपूर्ती झाली अशाच भावनेतून चालेल काय, तसे होत नसल्याचेच आज पुन्हा एकदा कालिदासच्या प्रश्नांवर नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना गमे यांची भेट घ्यावी लागली. एकंदरच नूतनीकरण झाले, परंतु त्यातून कलावंतांचे खच्चीकरण होते की काय अशी शंका आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका