शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरण झाले, वाद कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:58 IST

शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी आरेखन झाले आणि निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुमारे सहा महिने कलामंदिर बंद होते, त्यानंतर ते सुरू झाले. त्यातील रंगसंगती आणि सुविधा बघून सारेच भारावले, परंतु नंतर मात्र अनेक समस्या जाणवू लागल्या. हायटेक ध्वनी यंत्रणेचे महापालिकेला संचलन होईना. नूतनीकरण म्हणजे जणू नवी इमारत बांधली अशा थाटात नवा गडी नवा राज सुरू झाले आणि महापालिकेने त्यासाठीच नियमावलीच बदलली आहे. कामकाज सुलभ असेल तर कोणत्याही वास्तुला प्रतिसाद मिळतो, परंतु असे प्रत्यक्षात झालेले नाही. तांत्रिक सुविधांची हाताळणी, प्रत्येक सेवा सशुल्क या बरोबरच भाडेवाढीचा विषय गेल्या वर्षभर गाजला अन् त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी नाट्य व्यावसायिक आणि कलावंत मात्र समाधानी नाहीत. त्यामुळे गेल्याच महिन्यात या साऱ्यांनी पुन्हा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली.वास्तविक अनेक गोष्टी लहानसहान आहेत त्याचे निराकरण झाले तरी कलावंतांची नाराजी दूर होऊ शकेल, परंतु जे नियमात आहे त्या पलीकडे जाऊन व्यावसायिकांची अपेक्षा असल्याचे यापूर्वीही तत्कालीन अधिकाºयांचे मत होते. तर कलावंतांवर अन्याय म्हणजे कला आणि संस्कृतीवर अन्याय अशाप्रकारची भावना कलाकार व्यक्त करीत आहेत. त्यातच नूतनीकरण केल्यानंतर ज्या प्रमाणात उत्पन्न हवे होते, त्या तुलनेत ते मिळाले नाही. उलट वीस लाखांंनी उत्पन्न घटले आहेत. आयुक्तांनी याबाबत संबंधित अधिकाºयांकडे जाब विचारला असला तरी त्याचे उत्तर देण्यासाठी कालिदास कलामंदिराकडे पूर्ण व्यवस्थापक आहेच तरी कोठे?कालिदासचे नूतनीकरण झाले आणि स्मार्ट कालिदास म्हणजे उद्दिष्टपूर्ती झाली अशाच भावनेतून चालेल काय, तसे होत नसल्याचेच आज पुन्हा एकदा कालिदासच्या प्रश्नांवर नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना गमे यांची भेट घ्यावी लागली. एकंदरच नूतनीकरण झाले, परंतु त्यातून कलावंतांचे खच्चीकरण होते की काय अशी शंका आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका