शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नूतनीकरण झाले, वाद कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:58 IST

शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न आहे.महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी आरेखन झाले आणि निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुमारे सहा महिने कलामंदिर बंद होते, त्यानंतर ते सुरू झाले. त्यातील रंगसंगती आणि सुविधा बघून सारेच भारावले, परंतु नंतर मात्र अनेक समस्या जाणवू लागल्या. हायटेक ध्वनी यंत्रणेचे महापालिकेला संचलन होईना. नूतनीकरण म्हणजे जणू नवी इमारत बांधली अशा थाटात नवा गडी नवा राज सुरू झाले आणि महापालिकेने त्यासाठीच नियमावलीच बदलली आहे. कामकाज सुलभ असेल तर कोणत्याही वास्तुला प्रतिसाद मिळतो, परंतु असे प्रत्यक्षात झालेले नाही. तांत्रिक सुविधांची हाताळणी, प्रत्येक सेवा सशुल्क या बरोबरच भाडेवाढीचा विषय गेल्या वर्षभर गाजला अन् त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी नाट्य व्यावसायिक आणि कलावंत मात्र समाधानी नाहीत. त्यामुळे गेल्याच महिन्यात या साऱ्यांनी पुन्हा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली.वास्तविक अनेक गोष्टी लहानसहान आहेत त्याचे निराकरण झाले तरी कलावंतांची नाराजी दूर होऊ शकेल, परंतु जे नियमात आहे त्या पलीकडे जाऊन व्यावसायिकांची अपेक्षा असल्याचे यापूर्वीही तत्कालीन अधिकाºयांचे मत होते. तर कलावंतांवर अन्याय म्हणजे कला आणि संस्कृतीवर अन्याय अशाप्रकारची भावना कलाकार व्यक्त करीत आहेत. त्यातच नूतनीकरण केल्यानंतर ज्या प्रमाणात उत्पन्न हवे होते, त्या तुलनेत ते मिळाले नाही. उलट वीस लाखांंनी उत्पन्न घटले आहेत. आयुक्तांनी याबाबत संबंधित अधिकाºयांकडे जाब विचारला असला तरी त्याचे उत्तर देण्यासाठी कालिदास कलामंदिराकडे पूर्ण व्यवस्थापक आहेच तरी कोठे?कालिदासचे नूतनीकरण झाले आणि स्मार्ट कालिदास म्हणजे उद्दिष्टपूर्ती झाली अशाच भावनेतून चालेल काय, तसे होत नसल्याचेच आज पुन्हा एकदा कालिदासच्या प्रश्नांवर नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना गमे यांची भेट घ्यावी लागली. एकंदरच नूतनीकरण झाले, परंतु त्यातून कलावंतांचे खच्चीकरण होते की काय अशी शंका आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका