शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

दीडशे कोटीचे कर्ज काढण्यास मान्यता पालिकेला दिलासा: एकूण साडेतीनशे कोटींचे ऋण काढणार

By admin | Updated: May 24, 2014 00:50 IST

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे.

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाने कालच हा निर्णय घेतला असून, महापालिकेला तो प्राप्त झाला आहे. महापालिकेला नेहरू अभियानांतर्गत कामे पूर्ण करणे, शहरातील रस्ते विकसित करणे, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत कामे करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार दोनशे कोटी रुपये इतकेच दीर्घ मुदतीचे कर्ज उभारण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. दरम्यान, महासभेच्या ठरावानुसार आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ डिसेंबर २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने महत्त्वाची विकासकामे आणि रस्ते तसेच सिंहस्थ पूर्व कामांसाठी कर्ज उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. कर्ज उभारणीसाठी प्राप्त झालेले व्याजदर आणि अटी, शर्ती अंतिम मंजुरीनंतर राज्य शासनाला पाठविणे आणि शासनाची मंजुरी घेणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे महापालिकेची कोणतीही मालमत्ता शासनाच्या मान्यतेशिवाय गहाण ठेवता येणार नाही,अशा दोन अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.नाशिक महापालिकेने नेहरू नागरी अभियानात सहभाग घेतल्यानंतर एकूण प्रकल्पाच्या तीस टक्के रक्कम महापालिकेलाच खर्च करावी लागणार होती. परंतु अनेक कामांसाठी पालिकेला पन्नास टक्क्यांच्या आसपास रक्कम खर्च करावी लागली आहे. त्याचप्रमाणे आता सिंहस्थ कामांसाठी आर्थिक बोजा महापालिकेची मोठी अडचण झाली होती. परंतु आता पालिकेची आर्थिक टंचाई काही प्रमाणात दूर होणार आहे.दुसर्‍यांदा इतके मोठे कर्जमहापालिकेने यापूर्वी शंभर कोटी रुपयांचे मोठे कर्ज १९९९-२००० मध्ये काढले होते. कॉँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना कर्जरोख्यांद्वारे ही रक्कम उभी केली होती. त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज काढले जात आहे.अगोदरची कर्जप्रक्रिया प्रलंबितचमहापालिकेला यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. परंतु महापालिकेने वर्ष होत आले तरी अद्याप कर्ज काढलेले नाही. बॅँकांकडून प्रस्ताव मागविण्यातच कालहरण झाले आहे. त्यामुळे आता हे नव्याने मंजूर झालेले कर्ज कधी काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.