शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अवघ्या दोन तासांत हटविले गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:50 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़ त्यामुळे नागरिकांच्या जिवापेक्षा महापालिकेने परवानगीचा मुद्दा पुढे करून ही कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़ दरम्यान, यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता असून, मनपाच्या या कृत्यावर सोशल मीडियामधून संताप व्यक्त केला जात आहे़तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने अपघाताचा हॉट स्पॉट म्हणून तारवालानगर चौफुलीची ओळख निर्माण झालेली होती़ या अपघातांना आळा बसावा यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका व पोलीस प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती़ दोन दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सहकार्याने गतिरोधक टाकण्याचे काम करण्यात आले होते. या गतिरोधकामुळे अपघातांना निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास नागरिकांमध्ये होता़ मात्र, या गतिरोधकावर महापालिका प्रशासनाची वक्रदृष्टी पडली अन् अवघ्या दोन तासांतच चौफुलीवर टाकलेले गतिरोधक महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले.महापालिकेने दोन तासांपूर्वी टाकलेले गतिरोधक काढल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी मनपाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर महापालिकेचा जाहीर निषेध नोंदविला़ अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून गतिरोधक बसविण्याची कार्यवाही केली जाते तर मनपा तेच गतिरोधक उखडून टाकण्याचे काम करीत असल्याने पोलीस व मनपा महापालिका यांच्यातील वादामुळे गतिरोधक बसविण्याच्या कामाला सध्या तरी ब्रेक लागला आहे.महापौरांचा  जाण्या-येण्याचा रस्तानाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजनाताई भानसी या दररोज याच रस्त्याने ये-जा करतात़ या ठिकाणी होणाºया अपघातांचीही त्यांना जाणीव आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावर क़ का़ वाघ महाविद्यालया जवळ टाकलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांना आळा बसला आहे़ त्याप्रमाणे तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक टाकल्यास अपघातांना नक्कीच आळा बसेल़ त्यामुळे महापौरांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा