शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:30 IST

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हाकार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी दिलीप पाटील म्हणाले की, अनेक विद्वानांनी कवितेची व्याख्या करून ठेवली असली, तरी ज्याप्रमाणे सर्व धर्मांचे सार मानवतेत असते, तसेच कवितेचे सारतत्त्व सत्यात असते, असेही पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, कविता कल्पनेत रमत नाही. ती कधी आनंदाची बाग असते, तर कधी धगधगते वास्तव असते. ‘जंगले तुटतील, नद्या आटतील, डोळ्यांतही शिल्लक नसेल पाणी, आपल्याच कर्माने आपणच गाऊ उन्हाची गाणी’ या कवितेच्या ओळी सादर करीत त्यांनी भविष्यातील दुष्काळी स्थितीवर भाष्य केले.ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी ‘स्वप्न’ ही कविता सादर केली. तत्पूर्वी त्यांनी शोकसभेऐवजी कविसंमेलन आयोजित केल्याचे सांगितले. येत्या वर्षभरात कवी भीमराव कोते यांच्या ‘माणसांच्या कविता’ प्रसिद्ध व्हाव्यात, तीच त्यांना आदरांजली ठरेल, अशी अपेक्षाही पाठक यांनी व्यक्त केली.कविसंमेलनात कवी सुमती पवार, कविता बिरारी, प्रमोद कुलकर्णी, भारती देव, कमलाकर पाटील, प्रा. अरु ण सोनवणे, राधाकृष्ण साळुंके,मुुकुंद गायधनी, विजय थिगळे,अलका कुलकर्णी, नितीन गाडवे, जनार्दन देवरे, प्रशांत केंदळे,सत्यजित पाटील, चंद्रशेखर सावरे, किरण मेतकर, श्रीकांत चवरे, रमेश आव्हाड, दत्तात्रय दाणी, संदीप देशपांडे यांनी कविता सादर केल्या.भावना कुलकर्णी व आकाशकंकाळ यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. डॉ. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, देवदत्त जोशी यांच्यासह रसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक