शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आनंदोत्सव साजरा न करता हुतात्म्यांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:24 IST

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या लढ्यानंतर समाजाने ऐतिहासिक यशप्राप्ती करीत आरक्षणाचा लढा विजयी केला. परंतु, हा लढा लढताना ४२ तरुणांनी आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे या अभूतपूर्व लढ्यात समाजाला दिलासा मिळाला असला तरी नाशिक सकल मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा न करता रामकुंड परिसरात सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून दीपप्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली.

नाशिक : मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या लढ्यानंतर समाजाने ऐतिहासिक यशप्राप्ती करीत आरक्षणाचा लढा विजयी केला. परंतु, हा लढा लढताना ४२ तरुणांनी आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे या अभूतपूर्व लढ्यात समाजाला दिलासा मिळाला असला तरी नाशिक सकल मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा न करता रामकुंड परिसरात सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून दीपप्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज मतभेद बाजूला सारत ‘एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन लाखोंच्या संख्येने लहान मुलांसह महिला, पुरुष, युवकांसह ज्येष्ठ नागिरकांसह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यामाध्यातून ऐतिहासिक मूक मोर्चे काढून लढा देण्यात आला. या आंदोलनात जवळपास १५ हजार आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ४२ तरुणांना आरक्षणाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या घटनांना परिस्थितीत शासन व प्रशासनाने घेतलेली भूमिका कारणीभूत असल्याने आरक्षण विधेयक स्वागरतार्ह असले तरी या लढ्यात गमावलेल्या समाजबांधवांचे दु:खही यासोबत आहे.  त्यामुळे नाशिक मराठा क्रांती  मोर्चातर्फे या समाजबांधवांचे स्मरण करून रामकुं डावर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, सचिन पवार, विलास जाधव, उमेश शिंदे, नीलेश मोरे ,चेतन शेलार, सोमनाथ जाधव, गणेश कदम, शिवाजी मोरे,  विजय खर्जुल, मनोज सहाणे, सागर पवार, सूरज पवार, विजय खर्जुल, सोमनाथ जाधव, सचिन शिंदे,  प्रशांत अवटे, पूजा धुमाळ, मंगला शिंदे, मयुरी पिंगळे, अस्मिता  देशमाने, प्रियदर्शनी काकडे,  प्रीती महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा