शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

नाशिक : ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात विवेकधाराच्या वतीने रविवारी (दि.२४) आयोजित पाचव्या नास्तिक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कसबे यांनी ‘नास्तिकता : एक जीवनशैली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पृथ्वीवर दहा लाख वर्षांपूर्वी मानवजाती निर्माण झाली. खरोखर ईश्वर असता तर त्याने त्यापूर्वीच माणूस का बनवला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘ईश्वराने माणसाची निर्मिती केली’ हे विधान मान्य करण्यासारखे नाही. ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास प्रारंभ करायला हवा. माणसाला अन्य कोणत्याही शक्तीने मदत करता तो स्वत:च्या प्रयत्नाने माणूस झाला व त्याने वेगळे जग निर्माण केले. ईश्वरी कल्पना मानवनिर्मित असून, माणूस ईश्वराचा निर्माता आहे, असेही कसबे यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रियदर्शन भारतीय यांनी आभार मानले.पालकांचे वर्तन महत्त्वाचेमुलांवर नास्तिकतेचे संस्कार करताना पालकांचे वर्तन व संवाद महत्त्वाचा असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘नास्तिक पालकत्व : जबाबदारी व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला. त्यात लेखक प्रा. अभिजित देशपांडे, मानसशास्त्रज्ञ आशिष कोरडे, स्तंभलेखक योगेश गायकवाड व लेखिका गौरी पटवर्धन यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक