शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

नाशिक : ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात विवेकधाराच्या वतीने रविवारी (दि.२४) आयोजित पाचव्या नास्तिक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कसबे यांनी ‘नास्तिकता : एक जीवनशैली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पृथ्वीवर दहा लाख वर्षांपूर्वी मानवजाती निर्माण झाली. खरोखर ईश्वर असता तर त्याने त्यापूर्वीच माणूस का बनवला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘ईश्वराने माणसाची निर्मिती केली’ हे विधान मान्य करण्यासारखे नाही. ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास प्रारंभ करायला हवा. माणसाला अन्य कोणत्याही शक्तीने मदत करता तो स्वत:च्या प्रयत्नाने माणूस झाला व त्याने वेगळे जग निर्माण केले. ईश्वरी कल्पना मानवनिर्मित असून, माणूस ईश्वराचा निर्माता आहे, असेही कसबे यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रियदर्शन भारतीय यांनी आभार मानले.पालकांचे वर्तन महत्त्वाचेमुलांवर नास्तिकतेचे संस्कार करताना पालकांचे वर्तन व संवाद महत्त्वाचा असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘नास्तिक पालकत्व : जबाबदारी व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला. त्यात लेखक प्रा. अभिजित देशपांडे, मानसशास्त्रज्ञ आशिष कोरडे, स्तंभलेखक योगेश गायकवाड व लेखिका गौरी पटवर्धन यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक