शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : प्रा. सोपान वाटपाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:08 IST

गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले.

ठळक मुद्देतर जिजाऊ जन्माला यायला हव्याशिवरायांचे विचार डोक्यात घालून तशी वागणूक करण्याची वेळ आज आली

नाशिक : स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘शिवचरित्र- आधुनिक समस्यांवर शिवचरित्रातून उपाय’ या विषयावर वाटपाडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार व संभाजी राजे भोसले यांचा त्याग व समर्पण याविषयी प्रबोधन केले. यावेळी ते म्हणाले, जातीपातीवरील राजकारण आणि दंगे यावर मूळ शोधण्यासाठी समाजाला शिवछत्रपतींचे चरित्र समजून घ्यावे लागणार आहे. त्यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्याची नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून तशी वागणूक करण्याची वेळ आज आली आहे. छत्रपतींनी सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले हे विसरून चालणार नाही. आज शिवचरित्र व शिवजयंती मनोरंजन आणि धिंगाण्यापलीकडे जात नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत असल्याची खंतही वाटपाडे यांनी बोलताना व्यक्त केली. आजच्या संगणकीय व आधुनिकतेच्या युगात छत्रपती शिवरायांचे महत्त्व तीळमात्रही कमी झालेले नाही. त्यांचे स्वराज्य कोणत्याही जाती, धर्म व पंथाच्या विरोधात कधीही नव्हते, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिवचरित्रामधून छत्रपतींचे उत्कृष्ट कुशल प्रशासन, व्यवस्थापन, कृषिधोरण, जलनीती, न्यायदान अशा विविध बाबी शिकता येतात....तर जिजाऊ जन्माला यायला हव्याशिवबा जन्माला यावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी आई जिजाऊ जन्माला यायला हव्या; मात्र आजची सुशिक्षित पिढी विज्ञान व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या माध्यमातून गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्या नाही तर शिवबा जन्माला कसा येईल? असा प्रश्न वाटपाडे यांनी बोलताना उपस्थित केला. आजच्या युगात मातेचे मातृत्व व प्रेमाशिवाय दुसरे काहीही प्रमााणिक शिल्लक राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मातांनी आपल्या मुळाबाळांवर जिजाऊंसारखे संस्कार के ल्यास प्रत्येक घराघरात शिवबा तयार होईल.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNashikनाशिकgodavariगोदावरी