शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : प्रा. सोपान वाटपाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:08 IST

गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले.

ठळक मुद्देतर जिजाऊ जन्माला यायला हव्याशिवरायांचे विचार डोक्यात घालून तशी वागणूक करण्याची वेळ आज आली

नाशिक : स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘शिवचरित्र- आधुनिक समस्यांवर शिवचरित्रातून उपाय’ या विषयावर वाटपाडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार व संभाजी राजे भोसले यांचा त्याग व समर्पण याविषयी प्रबोधन केले. यावेळी ते म्हणाले, जातीपातीवरील राजकारण आणि दंगे यावर मूळ शोधण्यासाठी समाजाला शिवछत्रपतींचे चरित्र समजून घ्यावे लागणार आहे. त्यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्याची नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून तशी वागणूक करण्याची वेळ आज आली आहे. छत्रपतींनी सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले हे विसरून चालणार नाही. आज शिवचरित्र व शिवजयंती मनोरंजन आणि धिंगाण्यापलीकडे जात नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत असल्याची खंतही वाटपाडे यांनी बोलताना व्यक्त केली. आजच्या संगणकीय व आधुनिकतेच्या युगात छत्रपती शिवरायांचे महत्त्व तीळमात्रही कमी झालेले नाही. त्यांचे स्वराज्य कोणत्याही जाती, धर्म व पंथाच्या विरोधात कधीही नव्हते, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिवचरित्रामधून छत्रपतींचे उत्कृष्ट कुशल प्रशासन, व्यवस्थापन, कृषिधोरण, जलनीती, न्यायदान अशा विविध बाबी शिकता येतात....तर जिजाऊ जन्माला यायला हव्याशिवबा जन्माला यावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी आई जिजाऊ जन्माला यायला हव्या; मात्र आजची सुशिक्षित पिढी विज्ञान व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या माध्यमातून गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्या नाही तर शिवबा जन्माला कसा येईल? असा प्रश्न वाटपाडे यांनी बोलताना उपस्थित केला. आजच्या युगात मातेचे मातृत्व व प्रेमाशिवाय दुसरे काहीही प्रमााणिक शिल्लक राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मातांनी आपल्या मुळाबाळांवर जिजाऊंसारखे संस्कार के ल्यास प्रत्येक घराघरात शिवबा तयार होईल.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNashikनाशिकgodavariगोदावरी