शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नास्तिकांपेक्षाही धर्माचे ठेकेदार अधिक घातक

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश : येवला येथील कार्यक्रमात प्रतिपादन

येवला : नास्तिक लोकांपेक्षाही धर्माचा ठेका घेतलेले धर्मांध ठेकेदार धर्म स्थानात बसून परस्परांची निंदा करत पसरवत असलेला द्वेष हा देखील आतंकवादच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन जैन मुनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येवल्यात केले.येवला मर्चंट को-आॅप. बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित प्रवचनात सात हजार किलो मीटरच्या प्रवासात आलेले अनुभव आणि देशहितासाठी सशक्त पिढी कशी घडेल हे सांगताना आतंकवादाचे विविध पैलू त्यांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले. ते म्हणाले, सर्व प्रकारचा द्वेष दूर सारून परस्परांशी प्रेमाने व चांगुलपनाने संवाद साधल्यास मानिसक शांती मिळेलच त्याचबरोबर प्रगतीही साधता येईल. जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या नावावर माणसा-माणसांत द्वेष पसरवणारे लोकच आतंकवादाचे मूळ आहेत. एकमेकाकडे द्वेषाने पाहणारे देखील आतंकवादी असून, दोन दरोडेखोर एकत्र राहू शकतात; परंतु या देशात दोन साधू एकमेकांचा द्वेष करत एकत्र राहू शकत नाही, हि शोकांतिका आहे. असेही कमलमुनी कमलेश यांनी सांगितले. धर्म हा सध्या पोट भरण्याचा धंदा झाला आहे. धार्मिक कट्टरतेने जीव घेतले जात आहेत. विविध धर्माच्या ठेकेदारांनी आपले विचार बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . गायींवर राजकारण करणारे देखील गोहत्येला जबाबदार असून गोमाता वाचवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी यावेळी कमलमुनी कमलेश यांनी केली . यावेळी श्रीराम गोशाळा, वैजापूर गोरक्षा समितीचे हिंदू व मुस्लीम समाजातील विविध कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय श्रीश्रीमाळ यांनी केले. प्रवचनासाठी प्रभाकर झळके, संजय मंडलेचा, हर्षल पारख, गुलाबराव पहीलवान , अजय जैन, आनंद शिंदे, सुभाषचंद संचेती, मधुकर घाटकर, बंटी धसे, शेखर सांबर यांच्यासह पुरु ष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.