शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

नास्तिकांपेक्षाही धर्माचे ठेकेदार अधिक घातक

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश : येवला येथील कार्यक्रमात प्रतिपादन

येवला : नास्तिक लोकांपेक्षाही धर्माचा ठेका घेतलेले धर्मांध ठेकेदार धर्म स्थानात बसून परस्परांची निंदा करत पसरवत असलेला द्वेष हा देखील आतंकवादच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन जैन मुनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येवल्यात केले.येवला मर्चंट को-आॅप. बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित प्रवचनात सात हजार किलो मीटरच्या प्रवासात आलेले अनुभव आणि देशहितासाठी सशक्त पिढी कशी घडेल हे सांगताना आतंकवादाचे विविध पैलू त्यांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले. ते म्हणाले, सर्व प्रकारचा द्वेष दूर सारून परस्परांशी प्रेमाने व चांगुलपनाने संवाद साधल्यास मानिसक शांती मिळेलच त्याचबरोबर प्रगतीही साधता येईल. जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या नावावर माणसा-माणसांत द्वेष पसरवणारे लोकच आतंकवादाचे मूळ आहेत. एकमेकाकडे द्वेषाने पाहणारे देखील आतंकवादी असून, दोन दरोडेखोर एकत्र राहू शकतात; परंतु या देशात दोन साधू एकमेकांचा द्वेष करत एकत्र राहू शकत नाही, हि शोकांतिका आहे. असेही कमलमुनी कमलेश यांनी सांगितले. धर्म हा सध्या पोट भरण्याचा धंदा झाला आहे. धार्मिक कट्टरतेने जीव घेतले जात आहेत. विविध धर्माच्या ठेकेदारांनी आपले विचार बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . गायींवर राजकारण करणारे देखील गोहत्येला जबाबदार असून गोमाता वाचवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी यावेळी कमलमुनी कमलेश यांनी केली . यावेळी श्रीराम गोशाळा, वैजापूर गोरक्षा समितीचे हिंदू व मुस्लीम समाजातील विविध कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय श्रीश्रीमाळ यांनी केले. प्रवचनासाठी प्रभाकर झळके, संजय मंडलेचा, हर्षल पारख, गुलाबराव पहीलवान , अजय जैन, आनंद शिंदे, सुभाषचंद संचेती, मधुकर घाटकर, बंटी धसे, शेखर सांबर यांच्यासह पुरु ष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.