शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

चणकापूर कालव्याला पूरपाणी सोडल्यामुळे देवळा तालुक्यातील जनतेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:51 IST

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देधरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या-नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझीम पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चणकापुर धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.दरवर्षी रामेश्वर धरण (७८.१४ द.ल.घ.फू) पूरपाण्याने भरल्यानंतर पुढे उजव्या वाढीव कालाव्याला पाणी सोडून पूर्व भागातील लहान मोठे साठवण बंधारे भरण्याचे नियोजन दरवर्षी करावे लागते. यामुळे शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटण्यास मदत होते. पाणी सोडल्यानंतर मात्र लाभक्षेत्रातील ह्या गावांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.गतवर्षी या ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कालव्याला सोडलेल्या पाण्याचे वाटप करण्यासाठी गावागावातील वादविवाद टाळत नियोजनपूर्वक तोडगे काढले होते. पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पाण्याची गळती रोखत पुरपाण्याच्या वितरणात महत्वाची भूमिका बजावली होती.डिसेंबर महिन्यात लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करून वहन क्षमता वाढविण्यात आली. त्याचा ह्या वर्षी लाभ होईल. चालू वर्षी वाढीव कालव्याला पाणी सोडल्यानंतर पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परीश्रम घ्यावे लागणार आहेत.अंदाजपत्रकाप्रमाणे चणकापूर उजव्या कालव्याची चणकापूर येथे सुरवातीची वहन क्षमता १८४.१९ क्युसेक्स असून रामेश्वर येथे शेवटी ती ७५ क्युसेक्स आहे. कालव्याच्या सदोष कामामुळे १२० क्युसेक्सपेक्षा अधिक क्षमतेने कालव्याच्या निर्मितीपासून एकदाही पाणी सोडता आलेले नाही. तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे.