शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चणकापूर कालव्याला पूरपाणी सोडल्यामुळे देवळा तालुक्यातील जनतेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:51 IST

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देधरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या-नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझीम पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चणकापुर धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.दरवर्षी रामेश्वर धरण (७८.१४ द.ल.घ.फू) पूरपाण्याने भरल्यानंतर पुढे उजव्या वाढीव कालाव्याला पाणी सोडून पूर्व भागातील लहान मोठे साठवण बंधारे भरण्याचे नियोजन दरवर्षी करावे लागते. यामुळे शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटण्यास मदत होते. पाणी सोडल्यानंतर मात्र लाभक्षेत्रातील ह्या गावांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.गतवर्षी या ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कालव्याला सोडलेल्या पाण्याचे वाटप करण्यासाठी गावागावातील वादविवाद टाळत नियोजनपूर्वक तोडगे काढले होते. पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पाण्याची गळती रोखत पुरपाण्याच्या वितरणात महत्वाची भूमिका बजावली होती.डिसेंबर महिन्यात लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करून वहन क्षमता वाढविण्यात आली. त्याचा ह्या वर्षी लाभ होईल. चालू वर्षी वाढीव कालव्याला पाणी सोडल्यानंतर पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परीश्रम घ्यावे लागणार आहेत.अंदाजपत्रकाप्रमाणे चणकापूर उजव्या कालव्याची चणकापूर येथे सुरवातीची वहन क्षमता १८४.१९ क्युसेक्स असून रामेश्वर येथे शेवटी ती ७५ क्युसेक्स आहे. कालव्याच्या सदोष कामामुळे १२० क्युसेक्सपेक्षा अधिक क्षमतेने कालव्याच्या निर्मितीपासून एकदाही पाणी सोडता आलेले नाही. तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे.