शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर कालव्याला पूरपाणी सोडल्यामुळे देवळा तालुक्यातील जनतेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:51 IST

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देधरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या-नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रिमझीम पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चणकापुर धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.दरवर्षी रामेश्वर धरण (७८.१४ द.ल.घ.फू) पूरपाण्याने भरल्यानंतर पुढे उजव्या वाढीव कालाव्याला पाणी सोडून पूर्व भागातील लहान मोठे साठवण बंधारे भरण्याचे नियोजन दरवर्षी करावे लागते. यामुळे शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटण्यास मदत होते. पाणी सोडल्यानंतर मात्र लाभक्षेत्रातील ह्या गावांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.गतवर्षी या ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कालव्याला सोडलेल्या पाण्याचे वाटप करण्यासाठी गावागावातील वादविवाद टाळत नियोजनपूर्वक तोडगे काढले होते. पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पाण्याची गळती रोखत पुरपाण्याच्या वितरणात महत्वाची भूमिका बजावली होती.डिसेंबर महिन्यात लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करून वहन क्षमता वाढविण्यात आली. त्याचा ह्या वर्षी लाभ होईल. चालू वर्षी वाढीव कालव्याला पाणी सोडल्यानंतर पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परीश्रम घ्यावे लागणार आहेत.अंदाजपत्रकाप्रमाणे चणकापूर उजव्या कालव्याची चणकापूर येथे सुरवातीची वहन क्षमता १८४.१९ क्युसेक्स असून रामेश्वर येथे शेवटी ती ७५ क्युसेक्स आहे. कालव्याच्या सदोष कामामुळे १२० क्युसेक्सपेक्षा अधिक क्षमतेने कालव्याच्या निर्मितीपासून एकदाही पाणी सोडता आलेले नाही. तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे.