शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

तुरळक सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:05 IST

देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ...

ठळक मुद्देभातपिकांना संजीवनी : देवगाव परिसरात समाधान

देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ओलावा मिळून नवसंजीवनी मिळणार असल्याने, चिंतेत असलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यासह दक्षिण भागातील शेतकरी बांधवांनी जूनच्या पहिला आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, काही रोपे माळरानावर असल्याने त्यांना नियमित पावसाची गरज असते. पंधरा दिवसांपासून देवगांव परिसरातील गावांमध्ये सर्वत्र कडक उन्हाने कहर केला होता. त्यामुळे उन्हामुळे पेरलेली रोपेही करपू लागली होती. पंधरा दिवसांत पावसाचा एकही थेंब न पडल्याने लावलेली रोपे ओलाव्याअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने, देवगांव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. पावसाच्या सरींमुळे ही पिके आता पुन्हा तग धरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर दोन-तीन दिवस पाऊस असाच कोसळत राहिला, तर उर्वरित शेतकऱ्यांची उरलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.- गत दोन वर्षे अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी अखेरच्या वेळी पाऊस न पडल्याने भातपिके करपून गेली होती, तर या वर्षी भात लागवडीसाठी रोपे तयार झाली असतानाही वेळेवरच पाऊस गायब झाल्याने मोठे संकट निर्माण होते.- वेळेत भातलावणी न झाल्यास पिकावर परिणाम होतो. भातांची दिवस मर्यादा असल्याने, काही भातपिके ९०, ११० हलवार तर काही १२०, १३५-४० गरवी पिके, यामुळे जर अधिक कालावधी रोपट्यात गेल्यास, त्याची उमेद तेथेच जाते. त्यामुळे शेतात लागवड केली, तरी नंतर त्याची वाढ होत नाही. परिणामी, दाणा पोसला जात नाही.पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भातपिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुसलेल्या पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने भातपिकांमध्ये ओलावा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.- अविनाश झोले, शेतकरी, टाकेदेवगाव.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस