शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त गावांना दिलासा

By admin | Updated: December 24, 2015 23:56 IST

भोजापूर धरण : लाभक्षेत्रातील साठवण बंधाऱ्यात पाणी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून दुष्काळग्रस्त गावांसाठी गुरुवारी (दि. २४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना ६२ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात परिसरातील पाणीटंचाई मिटणार आहे.तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणातून यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी साठवण बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई व धरणातील पाणीसाठा लक्षात घेता बिगर सिंचनाचे आवर्तन देणे शक्य असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना ६२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नांदूरशिंगोटे व भोजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आवर्तनासंदर्भात चर्चा केली होती. सोमवारीच आवर्तन सुटणार होते. परंतु पाणीपट्टी न आल्याने पाणी सोडण्यास दोन दिवस उशीर झाला आहे.या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे ३५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोडी कालव्यावरील शेवटच्या भागातील शिवाजीनगर व नांदूरशिंगोटे कालव्यावरील निमोण भागाला प्रथम पाणी पोहोचणार असून, ६ ते ७ दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणी येणार असल्याने पाणीटंचाई तात्पुरती दूर होणार आहे.भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. दोन्ही योजनांसाठी धरणात मृतसाठ्यासह ७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सात महिने २१ गावांची तहान उर्वरित पाण्यावर अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)