शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 00:02 IST

नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.

ठळक मुद्देकांदा-केळी : आजपासून होणार अंमलबजावणी

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जावीत, यासाठी दोनशे किलोमीटर अंतराची व १६०० मे. टन ही एका रेल्वे मालवाहतूक गाडीची मर्यादा असल्याने व सध्या एकाच वेळी एकाच बाजारपेठेत हा माल गेला तर कमी भाव मिळून नुकसानीची भीती असल्याने कांदा व केळी पाठविण्यास व्यापारीवर्ग तयार नव्हते. ही बाब समजताच राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचीव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने संपुर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरिता सुधारित आदेश जारी केला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी दि. १६ एप्रिलपासून दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ वॅगन्समधून ८०० मेट्रिक टन वाहतूकीस व दोन माल उतरविणेचे परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे