शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रेल्वे वाहतुकीच्या नियमात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 00:02 IST

नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.

ठळक मुद्देकांदा-केळी : आजपासून होणार अंमलबजावणी

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आता रेल्वेने १६०० मेट्रिक टनाऐवजी ८०० मेट्रिक टन वाहतुकीस व परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविल्याचे आदेश जारी केल्याची माहिती नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जावीत, यासाठी दोनशे किलोमीटर अंतराची व १६०० मे. टन ही एका रेल्वे मालवाहतूक गाडीची मर्यादा असल्याने व सध्या एकाच वेळी एकाच बाजारपेठेत हा माल गेला तर कमी भाव मिळून नुकसानीची भीती असल्याने कांदा व केळी पाठविण्यास व्यापारीवर्ग तयार नव्हते. ही बाब समजताच राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचीव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने संपुर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरिता सुधारित आदेश जारी केला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी दि. १६ एप्रिलपासून दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ वॅगन्समधून ८०० मेट्रिक टन वाहतूकीस व दोन माल उतरविणेचे परराज्यातील ठिकाणाचे दोनशे किलोमीटर अंतराची मर्यादा ५०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे