शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:06 IST

आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते.

मातोरी : आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. पुराचा नेहमीच या भागाला फटका बसत असल्याने गावातील कोळीवाडा व इतर परिसरातील रहिवाशांना शासनाने गायरानातील जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांचे तेथे पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.दहा दिवसांपूर्वी जोरदार झालेल्या पावसाने आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे आळंदी नदीला आलेल्या पुराचा मुंगसरे गावालाफटका बसला. नदीकिनारी असलेल्या शेतकऱ्यांची पिके, शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. त्यातून त्यांना सावरणे कठीण असले तरी अशा आपत्तीचा फटका परत बसू नये व जनतेच्या आर्थिक, शारीरिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी नदीकिनारी असलेल्या कोळीवाडा व इतर वस्तीला गायरानात स्थलांतरित करावे व तेथे अत्यावश्यक सुविधा देत पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासाठी ठराव व गावातील गावकऱ्यांच्या सह्या घेऊन त्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.यावेळी सरपंच कल्पनाताई भोर, उपसरपंच दीक्षिराम फडोळ, पोलीस पाटील बबन म्हैसधुणे, तलाठी प्रतिभा घुगे, शिवाजी भोर, विष्णुपंत म्हैसधुणे, रघुनाथ आंबेकर, सुधाम म्हैसधुणे, साहेबराव चारोसकर, भास्कर म्हैसधुणे, हिरामण नारळे, भाऊसाहेब धुळे, सुवर्णा आंबेकर आदी उपस्थित होते.गावाला आळंदी नदी, रामगंगा, म्हशिध ओहोळ आदी नाल्यांचे पाणी गावातून वाहत जाऊन नदीला मिळत असल्याने प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम गावातील घरांमध्ये पाणी शिरले. नदीकाठी गाव असल्याने ते स्थलांतरित होणे आवश्यक आहे. याबाबत निवेदने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देणार आहोत, तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.- विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी कार्याध्यक्षपुरामुळे गावातील सर्व लोके दोन दिवस मंदिरात आसरा घेऊन होते. त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा यासाठी गावामधील गायरानातील सुमारे दीडशे एकर जमिनीवर नदीकाठावरील लोकांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी गावाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.  - कल्पनाताई भोर, सरपंच

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका