शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शर्तींच्या जमिनी शासन जमा नांदगाव तहसीलदारांची सारवासारव : जमीनमालकांना भुर्दंड

By admin | Updated: May 26, 2015 01:26 IST

शर्तींच्या जमिनी शासन जमा नांदगाव तहसीलदारांची सारवासारव : जमीनमालकांना भुर्दंड

  नाशिक : आपल्याच अधिकारात शासनाच्या शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला नजराणा न भरताच बेकायदेशीर अनुमती देणाऱ्या नांदगाव तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपलेच आदेश मागे घेत, ज्या जमिनींचे व्यवहार होऊन शासन दप्तरी त्याच्या नोंदी झाल्या अशा जमिनी एकतर्फी शासन जमा करण्याची कार्यवाही केली असून, त्यांच्या या कृत्याने मात्र शर्तभंग झालेल्या जमीनमालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी त्याची दखल घेत याबाबत सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. त्याचबरोबर महाजन यांनी कशाच्या आधारे शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारांना परवानगी दिली त्याची माहितीही मागविली होती. मिळालेल्या माहितीनुसार महाजन यांनी दिलेल्या अनुमतीच्या आधारे जवळपास ५१ प्रकरणांमध्ये शासनाला नजराण्याची कोट्यवधीच्या रक्कमेवर पाणी सोडावे लागले. शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सदर जमिनीच्या बाजारमूल्याच्या पन्नास टक्के रक्कम शासनाच्या तिजोरीत नजराणा म्हणून भरावी लागते, परंतु शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारांना अनुमतीची गरज नसल्याचे पत्र दुय्यम निबंधकांना देऊन महाजन यांनी शासनाच्या महसुलाचे नुकसान तर केलेच त्याचबरोबर या व्यवहारांची शासन दप्तरी तडकाफडकी नोंदी घेतल्या गेल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. शर्तींच्या जमिनींचे विनापरवानगी व्यवहार झाल्यामुळे शर्त भंग झाला असून, महसूल अधिनियमान्वये शर्त भंग झालेल्या जमिनी शासन जमा करण्याची तरतूद आहे. तहसीलदार महाजन यांनी या साऱ्या बेकायदेशीर कृत्यातून बाहेर पडण्यासाठी सारवासारव करून आता ज्या ज्या जमिनींच्या नोंदी करण्यात आल्या त्या शर्त भंग ठरवून शासन जमा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शर्त भंग जमिनी शासन जमा करताना संबंधित दोन्ही बाजूच्या व्यक्तींना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेणे क्रमप्राप्त असताना महाजन यांनी जमीनमालकांना नोटिसा न बजावता थेट संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. अशा नोंदीमुळे आता ज्या ज्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झाले तेदेखील बेकायदेशीर ठरले आहेत.