शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विभागात गरोदर महिलांच्या मृत्यूत घट !

By admin | Updated: July 10, 2014 01:05 IST

विभागात गरोदर महिलांच्या मृत्यूत घट !

 

विजय मोरे

नाशिकगरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्ताशय असलेल्या महिलांवर विशेष लक्ष, जननी सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व वाहन सुविधा यामुळे प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण नाशिक विभागात घटले आहे. २०११-१२ मध्ये २१०, २०१२-१३ मध्ये १७२, तर २०१३-१४ मध्ये १७८ गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याचे नाशिकच्या आरोग्य उपसंचालक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी झाले असले, तरी उच्च रक्तदाब ही समस्या मात्र कायम आहे.नाशिक विभागातील जिल्ह्यांचा व ग्रामीण भागाचा विचार करता नाशिक जिल्ह्यात गरोदर माता मृत्यूची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून, त्यामानाने धुळे जिल्ह्यात सर्वात कमी आहे़ २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये ५४, धुळे- ८, जळगाव- ५०, नंदुरबार- ३० व अहमदनगरमध्ये ३० गरोदर मातांचे मृत्यू झाले़ २०१३-१४ मध्ये नाशिक- ५४, धुळे- ९, जळगाव- ३२, नंदुरबार ४३, तर अहमदनगरमध्ये ४० गरोदर मातांचा मृत्यू झाला़ मात्र ही सर्व आकडेवारी पाहता २०११-१२ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येते़आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर महिलांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद ठेवली जाते़ त्यामध्ये प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव, प्रसूतीपश्चात जंतुदोष, रक्तक्षय आणि अन्य कारणांमुळे महिलांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यामध्ये गरोदरपणातील उच्च रक्तदाब हीदेखील एक महत्त्वाची व चिंतेची बाब आहे. गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने संसर्गाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीकाळात ताप आल्यास महिलांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच शरीरातील रक्तपेशीही कमी होत असल्यास तत्काळ रक्तपेशी संक्रमित करून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे. चार वर्षांपूर्वी राज्यात १७५८ गरोदर मातांचा मृत्यू झाला होता. याची आरोग्य विभागाने दखल घेतली. त्यानुसार गर्भवती महिलांकरिता खास उपाय योजना करण्यास सुरुवात केली.गरोदर महिलांना वाहतूक, संदर्भसेवा, मोफत जेवण, औषधोपचार यांसह तपासण्या, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्तक्षय असलेल्या महिलांना लोहाचे इंजेक्शन, धनुर्वाताची लस आदि देण्यास सुरुवात केली़ यामुळे राज्यात माता मृत्यू दर कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पूर्वी अशा प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या़दरम्यान, अजूनही शंभर टक्के प्रसूती या रु ग्णालयात होत नाहीत. भोंदू डॉक्टर किंवा अर्धशिक्षित डॉक्टरांकडून घरीच प्रसूती करून घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहे. जमेल तसे प्रयत्न करायचे व नाहीच जमले तर रु ग्णास सरकारी दवाखान्यात सोडून द्यायचे, असे या भोंदू डॉक्टरांचे तत्त्व असते. त्यामुळे पात्र आणि अधिकृत डॉक्टरांकडूनच प्रसूतीदरम्यान तीन वेळा तपासणी, दिलेल्या १०० आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या नीट घेणे तसेच महिलेला योग्य वेळेत रुग्णालयात आणून पात्र डॉक्टरांकडून प्रसूती करून घेणे महत्त्वाचे आहे़