शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विभागात गरोदर महिलांच्या मृत्यूत घट !

By admin | Updated: July 10, 2014 01:05 IST

विभागात गरोदर महिलांच्या मृत्यूत घट !

 

विजय मोरे

नाशिकगरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्ताशय असलेल्या महिलांवर विशेष लक्ष, जननी सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व वाहन सुविधा यामुळे प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण नाशिक विभागात घटले आहे. २०११-१२ मध्ये २१०, २०१२-१३ मध्ये १७२, तर २०१३-१४ मध्ये १७८ गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याचे नाशिकच्या आरोग्य उपसंचालक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी झाले असले, तरी उच्च रक्तदाब ही समस्या मात्र कायम आहे.नाशिक विभागातील जिल्ह्यांचा व ग्रामीण भागाचा विचार करता नाशिक जिल्ह्यात गरोदर माता मृत्यूची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून, त्यामानाने धुळे जिल्ह्यात सर्वात कमी आहे़ २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये ५४, धुळे- ८, जळगाव- ५०, नंदुरबार- ३० व अहमदनगरमध्ये ३० गरोदर मातांचे मृत्यू झाले़ २०१३-१४ मध्ये नाशिक- ५४, धुळे- ९, जळगाव- ३२, नंदुरबार ४३, तर अहमदनगरमध्ये ४० गरोदर मातांचा मृत्यू झाला़ मात्र ही सर्व आकडेवारी पाहता २०११-१२ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येते़आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर महिलांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद ठेवली जाते़ त्यामध्ये प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव, प्रसूतीपश्चात जंतुदोष, रक्तक्षय आणि अन्य कारणांमुळे महिलांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यामध्ये गरोदरपणातील उच्च रक्तदाब हीदेखील एक महत्त्वाची व चिंतेची बाब आहे. गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने संसर्गाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीकाळात ताप आल्यास महिलांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच शरीरातील रक्तपेशीही कमी होत असल्यास तत्काळ रक्तपेशी संक्रमित करून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे. चार वर्षांपूर्वी राज्यात १७५८ गरोदर मातांचा मृत्यू झाला होता. याची आरोग्य विभागाने दखल घेतली. त्यानुसार गर्भवती महिलांकरिता खास उपाय योजना करण्यास सुरुवात केली.गरोदर महिलांना वाहतूक, संदर्भसेवा, मोफत जेवण, औषधोपचार यांसह तपासण्या, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्तक्षय असलेल्या महिलांना लोहाचे इंजेक्शन, धनुर्वाताची लस आदि देण्यास सुरुवात केली़ यामुळे राज्यात माता मृत्यू दर कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पूर्वी अशा प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या़दरम्यान, अजूनही शंभर टक्के प्रसूती या रु ग्णालयात होत नाहीत. भोंदू डॉक्टर किंवा अर्धशिक्षित डॉक्टरांकडून घरीच प्रसूती करून घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहे. जमेल तसे प्रयत्न करायचे व नाहीच जमले तर रु ग्णास सरकारी दवाखान्यात सोडून द्यायचे, असे या भोंदू डॉक्टरांचे तत्त्व असते. त्यामुळे पात्र आणि अधिकृत डॉक्टरांकडूनच प्रसूतीदरम्यान तीन वेळा तपासणी, दिलेल्या १०० आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या नीट घेणे तसेच महिलेला योग्य वेळेत रुग्णालयात आणून पात्र डॉक्टरांकडून प्रसूती करून घेणे महत्त्वाचे आहे़