शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

मागणी घटल्याने लाल कांद्याचे भाव घसरले

By admin | Updated: February 6, 2016 22:27 IST

आवक स्थिर : येवला बाजारात सरासरी ३०० रुपयांची घसरण

येवला : पश्चिम बंगाल, गुजरात, चाकण सह पुणे परिसरातील टिकाऊ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून त्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने नाशिकसह परिसरातील लाल कांद्याची आवक स्थिर असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने, या कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले असून ही घसरण अशीच सुरू राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कांदा घसरणीच्या परिस्थितीमुळे मुळातच दुष्काळी छायेत असलेला शेतकरी आणखी नागवला जाणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.येवला मार्केट यार्डवर शनिवारी ५५० रिक्षा व ८० ट्रॅक्टरमधून ६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येवला मार्केट यार्डवर कांद्याचे बाजारभाव ४०० ते १०२७ रुपये पर्यंत असून सरासरी ८०० रु पये प्रती क्विंटल होते. सरसरी १२५० रु पये प्रती क्विंटल विकला जाणारा लाल कांदा भावात निरंतर घसरण झाल्याने ८०० रुपयापर्यंत आल्याने बळीराजा हताश झाला आहे. येवला तालुक्यात शेतकऱ्यांकडे सध्या १ लाख क्विंटल लाल कांदा शेत शिवारात असण्याचा अंदाज आहे. नांदगाव, वैजापूर, कोपरगाव येथूनही येवला मार्केटला मोठ्या प्रमाणावर कांदा येत आहे. त्यामुळे कांद्याची आवक निरंतर स्थिर आहे. परंतु दिवसागणिक लाल कांद्याचे भाव घसरत आहे. नाशिक, नगर, जळगाव, चाळीसगाव, शिरपूर, नंदुरबार, या परिसरात नगदी पिकामुळे कांदा पीक लागवडीकडे आकर्षण वाढले आहे. इतर पिके सोडून बळीराजा कांदा पीक सर्वाधिक घेत असल्याने भरमसाठ उत्पन्न आहे. चाकण व पुणे भागातील फुरसुंगी कांदा व पश्चिम बंगालमधील गारवा कांदा हा नाशिक भागातील उन्हाळ कांद्यासारखाच टिकाऊ आहे. याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाल कांद्याची मागणी घटली आहे. याचा परिणाम म्हणून लाल कांद्याचे भाव घसरू लागले आहेत.येवला तालुका दुष्काळी असल्याने पाणी नाही, म्हणून कांद्याचे पीक घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी गंगापूर, वैजापूर, कन्नड, कोपरगाव, पैठणसह अन्य ठिकाणी २५ ते ३० हजार रुपये ठेक्याने कांदा लागवड करण्यासाठी कुटुंबांसह गेले आहे. काही शेतकरी तिसरा वाटा पद्धतीने अन्य ठिकाणी कांदा पीक घेत आहेत.परंतु कांद्याच्या भावात घसरण सुरु झाल्याने आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.