शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:01 IST

‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिक : ‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य परिषदेने नाशिक-मुंबई अशी लांब पदयात्रा जाहीर केल्याने यासाठी राज्यातील आदिवासी महिला-पुरुष बिºहाडासह शहरात धडकले. हजारो मोर्चेकऱ्यांना एकत्र जमण्यासाठी मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक रिकामे करून देण्यात आले होते. दुपारी बारा वाजेपासून मोर्चेकºयांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली. हातात लाल बावटे घेऊन मोर्चेकरी महामार्ग बसस्थानकात दाखल होत होते. दुपारी ४ वाजता ‘लॉँग मार्च’ शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल, असे ठरले होते. मात्र रात्री बसस्थानकातच मुक्काम करण्याचे निश्चित झाले़ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी किसान सभेच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलविले होते. या चर्चेतून ते सरकारच्या वतीने शेतकºयांच्या अमान्य मागण्यांवर तोडगा काढणार होते.डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘लॉँग मार्च’साठी राज्यभरातून किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.चटणी, भाकर अन् ठेचा...दुपारी बारा वाजेपासून पोहचलेल्या मोर्चेकºयांनी सोबत बांधून आणलेली शिदोरी उघडत चटणी, भाकर अन् ठेचावर ताव मारत भूक भागविली. यावेळी काही मोर्चेकरी महिलांनी हातात धरलेले रेशन मागणीच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ महिला, पुरुषांनी चक्क चटणी-भाकर खाऊन मोर्चात सहभागी होण्याचा केलेला निर्धार सरकारविरोधी एल्गार दाखविणारा ठरला.गिरीश महाजन हेलिकॉप्टरने दाखलकिसान सभेचा मोर्चा नाशिक-मुंबई असा जाणार असल्याचे समजल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी तत्काळ हेलिकॉप्टरने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील अधिकाºयांसोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील मोर्चेकºयांची स्थिती जाणून घेतली. रात्री दहा वाजता त्यांनी किसानसभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली.मुंबई नाक्यावरील वाहतूक विस्कळीत४संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाकडून आलेल्या मोर्चेकºयांच्या मोठ्या जत्थ्याने अचानकपणे महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबई नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोर्चेकºयांनी सुमारे अर्धा तास ठिय्या देत सरकारच्या विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चJ.P. Gavitजे.पी. गावित