शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:01 IST

‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिक : ‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य परिषदेने नाशिक-मुंबई अशी लांब पदयात्रा जाहीर केल्याने यासाठी राज्यातील आदिवासी महिला-पुरुष बिºहाडासह शहरात धडकले. हजारो मोर्चेकऱ्यांना एकत्र जमण्यासाठी मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक रिकामे करून देण्यात आले होते. दुपारी बारा वाजेपासून मोर्चेकºयांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली. हातात लाल बावटे घेऊन मोर्चेकरी महामार्ग बसस्थानकात दाखल होत होते. दुपारी ४ वाजता ‘लॉँग मार्च’ शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल, असे ठरले होते. मात्र रात्री बसस्थानकातच मुक्काम करण्याचे निश्चित झाले़ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी किसान सभेच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलविले होते. या चर्चेतून ते सरकारच्या वतीने शेतकºयांच्या अमान्य मागण्यांवर तोडगा काढणार होते.डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘लॉँग मार्च’साठी राज्यभरातून किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.चटणी, भाकर अन् ठेचा...दुपारी बारा वाजेपासून पोहचलेल्या मोर्चेकºयांनी सोबत बांधून आणलेली शिदोरी उघडत चटणी, भाकर अन् ठेचावर ताव मारत भूक भागविली. यावेळी काही मोर्चेकरी महिलांनी हातात धरलेले रेशन मागणीच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ महिला, पुरुषांनी चक्क चटणी-भाकर खाऊन मोर्चात सहभागी होण्याचा केलेला निर्धार सरकारविरोधी एल्गार दाखविणारा ठरला.गिरीश महाजन हेलिकॉप्टरने दाखलकिसान सभेचा मोर्चा नाशिक-मुंबई असा जाणार असल्याचे समजल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी तत्काळ हेलिकॉप्टरने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील अधिकाºयांसोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील मोर्चेकºयांची स्थिती जाणून घेतली. रात्री दहा वाजता त्यांनी किसानसभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली.मुंबई नाक्यावरील वाहतूक विस्कळीत४संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाकडून आलेल्या मोर्चेकºयांच्या मोठ्या जत्थ्याने अचानकपणे महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबई नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोर्चेकºयांनी सुमारे अर्धा तास ठिय्या देत सरकारच्या विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चJ.P. Gavitजे.पी. गावित