शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात सोडले भोजापूर धरणातून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:23 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तोडगा

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन २७ नोव्हेंबर रोजी भोजापूर धरणातून लाभक्षेत्रातील गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचवेळी फुलेनगर बंधाºयात आरक्षित पाणी सोडावे, यासाठी वावी परिसरातील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. सदर आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी वावी परिसरातील शेतकºयांनी लावून धरली होती. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी वावी परिसरातील शेतकºयांनी कालव्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लांबले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरण पसिररात संवेदनशील भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी चार वाजता २५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात धरणातून ७० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले.संगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरु राहणार आहे. यावेळी पाटंबधारे विभागाचे शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, बी. के. आचट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.शेतकºयांनी घेतली वाजे यांची भेटआमदार राजाभाऊ वाजे यांनी आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर, वावी व सायाळे येथील शेतकºयांची वावी येथे भेट घेऊन चर्चा केली. वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांच्यासोबत शेतकºयांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, सुधाकर भगत यांच्यासह काही शेतकरी उपस्थित होते.१२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तनसंगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे.