शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पोलीस बंदोबस्तात सोडले भोजापूर धरणातून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:23 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तोडगा

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन २७ नोव्हेंबर रोजी भोजापूर धरणातून लाभक्षेत्रातील गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचवेळी फुलेनगर बंधाºयात आरक्षित पाणी सोडावे, यासाठी वावी परिसरातील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. सदर आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी वावी परिसरातील शेतकºयांनी लावून धरली होती. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी वावी परिसरातील शेतकºयांनी कालव्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लांबले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरण पसिररात संवेदनशील भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी चार वाजता २५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात धरणातून ७० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले.संगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरु राहणार आहे. यावेळी पाटंबधारे विभागाचे शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, बी. के. आचट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.शेतकºयांनी घेतली वाजे यांची भेटआमदार राजाभाऊ वाजे यांनी आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर, वावी व सायाळे येथील शेतकºयांची वावी येथे भेट घेऊन चर्चा केली. वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांच्यासोबत शेतकºयांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, सुधाकर भगत यांच्यासह काही शेतकरी उपस्थित होते.१२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तनसंगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे.