शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

त्र्यंबक नगरपरिषदेची वसुली मोहीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे.मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.त्र्यंबक नगरपरिषदेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती कर्मचा-यांना पगाराला देखील पैसे देण्याइतपत नव्हती. दरम्यान शासन लॉकडाउन लागु करण्याचा विचार करीत आहे. यावेळेस अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणुन वसुलीची धडक मोहीम सुरु केली आहे.गावात प्रवेश करण्यापुर्वी वाहनतळ फी वसुली, जागा भाडे वसुली, पालिका गाळे वसुली आदींपासुन कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण मागच्या वर्षी यापैकी काहीच वसुली करण्यात आली नव्हती. सध्या जी वसुली सुरु आहे, ती मागच्या वर्षासह करण्यात येत आहे.घरपट्टी, पाणीपट्टी यांच्यात झालेली वाढ, वर्षभर जरी बील थकले तरी दंड व्याज वसुल केले जाते. त्यामुळे पालिका गंगाजळीत चांगल्या प्रमाणे उत्पन जमा होईल. यावेळी यदाकदाचित जरी लॉकडाउनची वेळ आली तरी पालिकेला आर्थिक परिस्थितीची झळ बसणार नाही. त्यामुळेच पालिकेने सर्वच कार्यालयीन कर्मचा-यांना वसुलीची जबाबदारी देत बाहेर काढले आहे.नगरपरिषदेला तसे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट असतांना प्रत्येक पालिकांची वसुली किमान ८० टक्के तर व्हावयास हवी. आणि शासकीय अनुदाने मिळतांना ८० टक्के वसुलीचे टार्गेट असते. सध्या जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची वसुलीची लगीनघाई सुरु आहे. त्र्यंबक नगरपरिषदेची देखील एवढी जोरदार वसुली असतांना अजुन ५० टक्के सुध्दा वसुलीच पुर्ण झालेली नाही.दरम्यान वसुलीसाठी पाणी पुरवठा इन्चार्ज कर निर्धारणा विभाग विजय सोनार मधुकर माळी मुख्याधिकारी चित्ते, संजय जाधव आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Trimabak Bhiseत्र्यंबक भिसेTaxकर