शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वसुली घटूनही कर्जवाटपात आठशे कोटींनी वाढ

By admin | Updated: August 6, 2016 00:39 IST

जिल्हा बॅँक : ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण

 नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप कर्ज वाटपात तब्बल ८९४ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकेच नव्हे, तर शासन निर्णयानुसार ३१ जुलै अखेर सुमारे सात हजार सभासदांच्या ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे लोखंडी तिजोरी खरेदी, सीसीटीव्ही खरेदी, नोकर भरतीसह अन्य कारणांनी बॅँकेची आर्थिक स्थिती काहीशी डळमळीत झालेली असताना आणि मागील वर्षाच्या दुष्काळामुळे कर्जवसुलीवर प्रतिकूल परिणाम झालेला असताना यावर्षी खरिपाच्या कर्ज वाटपात जिल्हा बॅँकेने सढळ हाताने कर्ज दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह नगदी पिके काढण्याकडे कल वाढविला आहे. सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात ३० जून २०१५ अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एक लाख ४२ हजार ३१८ सभासदांना ७८३ कोटी ४४ लाख ८० हजारांचे कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत यावर्षी दोन लाख २८ हजार ७९८ सभासदांना १६७७ कोटी ७९ लाख ९८ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८६ हजार ४८० जास्त सभासदांना ८९४ कोटी ३५ लाख १८ हजार जास्तीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅँकेने यंदा चांगला पाऊस झाल्याने खरिपासाठी चांगले कर्ज वाटप केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी हाच कर्ज वाटपाचा आकडा २२०० ते २३०० कोटींच्या घरात पोहोचला होता; मात्र आता कर्जाचा आलेख १६७७ कोटींपर्यंत खाली उतरला आहे. (प्रतिनिधी)