शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:37 IST

नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहका-रमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या ...

नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहका-रमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदा- धिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (दि. २) मेळावा घेतला, यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करताना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर सुरू असलेली मतमतांतरे दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच बूथप्रमुख व पदाधिकाºयांच्या नियुक्त्या होतील, त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटपर्यंत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वांनी काम करण्याची गरज असून, पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.राज्याच्या राजकारणाचा आधारराज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटना आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा