शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:37 IST

नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहका-रमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या ...

नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहका-रमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदा- धिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (दि. २) मेळावा घेतला, यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करताना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर सुरू असलेली मतमतांतरे दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच बूथप्रमुख व पदाधिकाºयांच्या नियुक्त्या होतील, त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटपर्यंत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वांनी काम करण्याची गरज असून, पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.राज्याच्या राजकारणाचा आधारराज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटना आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा