शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नाशिकमधील क्रांतिकारकांच्या घरांना मिळणार ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:42 IST

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देफलक लावणार : ९ आॅगस्टपासून अभिनव भारत मंदिर ट्रस्ट करणार शुभारंभ; अन्य फलकही लवकरच

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.येत्या ९ आॅगस्टपासून म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्या वाड्यात भाड्याने वास्तव्यास होते अशा सध्याच्या तिवारी वाड्यापासून हा शुभारंभ करण्यात येणार आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात नाशिक अग्रेसर होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमी असल्याने त्यांच्या प्रेरणेने अनेक जण या चळवळीत येऊन क्रांतिकारक झाले. काहींची नावे ज्ञात असली तरी अनेकांची नावे विस्मृतीत गेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनेच कलेक्टर जॅक्सनचा वध विजयानंद थिएटरमध्ये २१ डिसेंबर १९०९ रोजी करण्यात आला. तिळभांडेश्वर लेनमधील वर्तकांच्या वाड्यात सावरकर भाड्याने राहात होते. हा वाडा तिवारी यांनी घेतला. परंतु त्यात बदल मात्र केले नाहीत. त्याच वाड्यावर असा फलक लावून शुभारंभ करण्यात येईल. अन्य क्रांतिकारकांच्या जन्मदिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी फलक लावण्यात येणार आहेत. - सूर्यकांत रहाळकर, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिकहुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे नाव सर्वश्रुत असले तरी त्याचबरोबर कृष्णा गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे हेदेखील प्रामुख्याने सहभागी होते. अशा अनेक क्रांतिकारकांपैकी केवळ सावरकरांची प्रभावळ मानले जातील असे अनेक क्रांतिकारक होते. त्यातील ३३ जणांची माहिती अभिनव भारत मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध आहे. नव्या पिढीला नाशिकचे क्रांतिकारक कोण होते आणि कोठे वास्तव्यास होते याची माहिती व्हावी यासाठी अशा क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थान असलेल्या वाड्यांवर किंवा आता इमारतीत रूपांतरित झालेल्या घरांवर फलक लावण्यात येणार आहे. आता तो वाडा पूर्णत: तिवारी यांच्या मालकीचा आहे.४अभिनव भारत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थानावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान’ असा छोटा फलक लावण्यात येणार असून त्यासाठी जागामालकांची संमतीदेखील घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक