शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकमधील क्रांतिकारकांच्या घरांना मिळणार ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:42 IST

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देफलक लावणार : ९ आॅगस्टपासून अभिनव भारत मंदिर ट्रस्ट करणार शुभारंभ; अन्य फलकही लवकरच

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.येत्या ९ आॅगस्टपासून म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्या वाड्यात भाड्याने वास्तव्यास होते अशा सध्याच्या तिवारी वाड्यापासून हा शुभारंभ करण्यात येणार आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात नाशिक अग्रेसर होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमी असल्याने त्यांच्या प्रेरणेने अनेक जण या चळवळीत येऊन क्रांतिकारक झाले. काहींची नावे ज्ञात असली तरी अनेकांची नावे विस्मृतीत गेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनेच कलेक्टर जॅक्सनचा वध विजयानंद थिएटरमध्ये २१ डिसेंबर १९०९ रोजी करण्यात आला. तिळभांडेश्वर लेनमधील वर्तकांच्या वाड्यात सावरकर भाड्याने राहात होते. हा वाडा तिवारी यांनी घेतला. परंतु त्यात बदल मात्र केले नाहीत. त्याच वाड्यावर असा फलक लावून शुभारंभ करण्यात येईल. अन्य क्रांतिकारकांच्या जन्मदिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी फलक लावण्यात येणार आहेत. - सूर्यकांत रहाळकर, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिकहुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे नाव सर्वश्रुत असले तरी त्याचबरोबर कृष्णा गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे हेदेखील प्रामुख्याने सहभागी होते. अशा अनेक क्रांतिकारकांपैकी केवळ सावरकरांची प्रभावळ मानले जातील असे अनेक क्रांतिकारक होते. त्यातील ३३ जणांची माहिती अभिनव भारत मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध आहे. नव्या पिढीला नाशिकचे क्रांतिकारक कोण होते आणि कोठे वास्तव्यास होते याची माहिती व्हावी यासाठी अशा क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थान असलेल्या वाड्यांवर किंवा आता इमारतीत रूपांतरित झालेल्या घरांवर फलक लावण्यात येणार आहे. आता तो वाडा पूर्णत: तिवारी यांच्या मालकीचा आहे.४अभिनव भारत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थानावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान’ असा छोटा फलक लावण्यात येणार असून त्यासाठी जागामालकांची संमतीदेखील घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक