शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुकणे धरणातून आवर्तन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:13 IST

इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर मुकणे धरणातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. दारणा धरणाचे पाणी वैजापूर कालव्यासाठी, तर मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव, राहात्यासाठी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकरी समाधानी : मराठवाड्याला होणार फायदा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर मुकणे धरणातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. दारणा धरणाचे पाणी वैजापूर कालव्यासाठी, तर मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव, राहात्यासाठी सोडण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यात यंदा सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे तालुक्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरून पाण्याचा मुबलक साठा तयार झाला. त्यामुळे नांदूरमधमेश्वर आणि जायकवाडी प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक पाणीसाठा तयार झाला आहे. मराठवाडा आणि अन्य भागाला पुढचे काही वर्षं पुरेल इतके पाणी मुकणे प्रकल्पामध्ये साचल्याने यंदा फेब्रुवारीपर्यंत इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे धरणातील पाणीसाठा जैसे थे आहे, मात्र उन्हाची तीव्रता आणि कोपरगाव, राहाता तसेच वैजापूर कालव्यात पाण्याची आवश्यकता भासू लागल्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण