शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

चार वर्षांपासून १६ हजार झाडांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:47 IST

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे.

झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे. झाडे जगविण्याचा ध्यास घेतलेल्या एका वृक्षप्रेमीने पंधरा वर्षे शहर व परिसरात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने जाऊन सुरक्षित जागेवर खड्डे खोदून झाडे लावण्याचा विडा उचलला. हे कार्य करताना चार वर्षांपूर्वी या वृक्षप्रेमीच्या डोक्यात एका सुपीक कल्पनेचा जन्म झाला आणि एकाच दिवशी दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट अन् ती जगविण्याचा ध्यास शेखर गायकवाड नावाच्या वृक्षप्रेमीसह शेकडो स्वयंसेवकांनी घेतला. त्यांच्या आपलं पर्यावरण संस्थेने २०१५ साली ‘वनमहोत्सव’ची हाक प्रथम नाशिककरांना दिली. नाशिककरांनी सातपूर भागात आयोजित असा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर दिवसभरात उद्दिष्टापेक्षा एक हजार रोपे अधिक लावली गेली. या उपक्रमाची पुनरावृत्ती संस्थेने २०१६ मध्ये पुन्हा केली आणि लोकसहभागातून सहा हजार पाचशे रोपांची लागवड करून म्हसरू ळ शिवारात वनमहोत्सव साजरा केला.  केवळ झाडे लावली आणि ती रामभरोसे सोडली असे या संस्थेने अजिबात केले नाही तर लावलेल्या सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. २०१५ पासून संस्था सातपूर येथे‘देवराई’ व म्हसरूळला ‘वनराई’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.अशी जगविली रोपेदोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे. लावलेल्या रोपट्यांना वेळोवेळी पाणी, खत देणे, आजूबाजूला वाढलेले गवत कापणे, जाळपट्टा घेऊन वणव्यापासून संरक्षण करणे, रोपट्यांभोवती आळे करून दर आठवड्याला त्यामध्ये पाणी भरणे अशा विविध पद्धतीने संवर्धनाची कामे संस्थेचे हरित सैनिक मागील चार वर्षांपासून करत आहेत.

टॅग्स :environmentवातावरण