शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

दहावीच्या निकालात झळकली विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही, तर मग निकाल कसा लागला, असा प्रश्न ...

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे आणि त्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा झालीच नाही, तर मग निकाल कसा लागला, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला असला तरी शिक्षण विभागाने नववीचा अंतिम निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदी विविध माध्यमांचा वापर करून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणदान करण्याची कार्यपद्धती निश्चित करून दहावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामुळे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असले तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तविक गुणवत्तेच्या आधारे गुणदान झाले आहे. त्यामुळे यावर्षीच्या निकालातून दहावीच्या विद्यार्थ्यांची वास्तविक गुणवत्ता दिसून येत असल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळातून उमटत आहे. दरम्यान,

दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजेपासून निकाल पाहता येणार असल्याची माहिती मिळाली आणि निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट वेबसाइट हॅक झाल्याने निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून आले. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकालाच्या दोन्ही लिंक पाहत असल्याने या साइट हँग झाल्या असण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने निकालासाठी यंदा result.mh-ssc.ac.in दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र, दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी, पालक निकालासाठी वारंवार या दोन्ही लिंकवर जात आहेत; पण त्या सुरू होत नसल्याने ते त्रस्त झाले होते.

कोट-१

कोरोना संकटकाळात परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या मूल्यांकन पद्धतीने गुणदान करताना दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार, असे अपेक्षित होतेच. या निकालात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण निश्चितपणे वाढले आहे; परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळालेले नाहीत. केवळ एका परीक्षेत काही विद्यार्थी त्यांची क्षमता सिद्ध करू शकत नाहीत; परंतु ते वर्षभर अभ्यास करीत असतात, हेच या निकालातून स्पष्ट होते.

-राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो.

कोट-२

कोरोनाच्या संकटकाळात शासनाने परीक्षा न घेता दहावीच्या विद्यार्थ्यांना नववी ‌व दहावीच्या एकत्रित अभ्यासाचे मूल्यांकन करून गुणदान करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता. या निर्णयामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असली तरी त्यांना मिळालेले गुण त्याच्यातील वास्तविक गुण‌वत्ता दर्शविणारे आहेत. शिवाय अशा प्रकारे निकाल जाहीर करून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर परीक्षा व निकालाचा कोणताही मानसिक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.

-गुलाब भामरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

कोट- ३

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही निकाल मिळू शकला नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे मुलांसोबतच कुटुंबातील सदस्यही नाराज झाले. मुले पास होणार असले तरी त्यांना उत्तीर्ण होण्याचा तत्काळ मिळणारा आनंद मात्र मिळू शकला नाही.

-अमोल डोंगरे, पालक

कोट- ४

शिक्षण मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर तब्बल दोन तास निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केला; परंतु निकाल उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सर्व मैत्रिणींमध्ये नाराजी पसरली. निकाल तत्काळ पाहायला मिळाला असता, तर सर्वांनी मिळून जल्लोष केला असता, आता पास होणार असल्याची खात्री असली तरी निकाल बघू शकलो नाही. त्यामुळे निराशा झाली आहे.

-आकांक्षा दराडे, विद्यार्थिनी