शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पुतळे उभारण्यापेक्षा वाचनसंस्कृती जोपासा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:32 IST

भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. साहित्यगंगेच्या प्रवाहातील दररोज डुबणारा वाचक एवढाच आपला साहित्याशी संबंध असल्याचे सांगतानाच एकसंघ समाजनिर्मितीची जबाबदारी असलेल्या साहित्यातील सारस्वतांच्या मतभेदामुळे मन सुन्न होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाशिक : भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. साहित्यगंगेच्या प्रवाहातील दररोज डुबणारा वाचक एवढाच आपला साहित्याशी संबंध असल्याचे सांगतानाच एकसंघ समाजनिर्मितीची जबाबदारी असलेल्या साहित्यातील सारस्वतांच्या मतभेदामुळे मन सुन्न होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.२३) दिमाखदार सोहळ्यात सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, कवी संमेलनाच्या अध्यक्ष रेखा भांडारे, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, समाज एकसंघ राखण्यात साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्यिकांनी मतभेद विसरून एकसंघ समाजनिर्मितीसाठी निर्भिडपणे लेखन केले पाहिजे. परंतु, आजकालच्या साहित्य संमेलनांमध्ये या मतभेदांमुळेच सरस्वतीची जागा लक्ष्मीने घेतल्याचे सांगत साहित्य संमेलनांमधील शाही बजेटविषयी त्यांनी बोचरी टीका केली. साहित्य आणि साहित्याच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे जिल्हास्तरीय मेळावे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. सोशल माध्यमांच्या काळात उन्मादी घटक जन्माला येत असताना साहित्यिकांसमोर समाजातील जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त करण्याची जबाबदारी आहे. तसेच शेतकºयांमध्येही प्रादेशिक वादाने जन्म घेण्याची भीती निर्माण होत असताना विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना एकसंघ ठेवण्याची शक्ती साहित्यात असल्याचे सांगतानाच क वी विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या साहित्यातून शेती आणि शेतकºयांच्या मांडलेल्या वेदना साºया महाराष्ट्रात सारख्याच असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक करताना सावानाकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांसह आगामी काळातील नियोजनाचीही माहिती दिली. प्राचार्य वेदश्री थिगळे व कवी किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन करताना ऐतिहासिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या आठवणी जागवल्या, तर सहायक सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.कविता हे अभिव्यक्त होण्याचे साधनकविता ही प्रत्येक भाषेच्या साहित्यिकासाठी व्यक्त तथा अभिव्यक्त होण्याचे साधन असून, कवितेत समाजमन परिवर्तनाचे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील कविसंमेलन अध्यश्र रेखा भांडारे यांनी व्यक्त केले. कवि संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मेळाव्याच्या रंगलेल्या कविसंमेलनात कवी अरुण इंगळे यांनी सादर केलेली ’तू होता बापा म्हणून’ कवितेने भरभरून दाद मिळवली. त्याचप्रमाणे चेतन पणेर यांची वर्क इज वर्कशीप, दत्रात्रय दाणी यांची ‘माणूस कसा असावा’ आणि राम पाठक यांची ‘प्रकाशाला नसते पाठ’ या कवितेसह विजय वराडे, चंद्रकांत ठासे आदि कवींनी सादर केलेल्या कवितांनाही रसिकांची पसंती मिळाली.