शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार  देणार  विधानभवनाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 14:47 IST

मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

ठळक मुद्देमेळावे, बैठका : रेशन दुकानदारांच्या मोर्चाची जय्यत तयारी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

नाशिक : राज्यातील रेशन दुकानदारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व परवानाधारक तसेच हॉकर्स, किरकोळ केरोसिन परवानाधारकांचा येत्या १९ मार्च रोजी काढण्यात येणा-या मोर्चाची जोरदार तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विभागीय, जिल्हा व तालुकानिहाय रेशन दुकानदारांच्या बैठका, मेळावे घेवून वातावरण निर्मिती केली जात आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी विधानभवनालाच वेढा मारण्याची तयारी रेशन दुकानदारांनी केली आहे.या संदर्भात कळवण येथे मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक वितरण प्रणालीत भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी सरकारी यंत्रणा नेहमीच करत असल्याने ते टाळण्यासाठी राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवाना धारकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, न्या. डी. पी. वधवा समितीने दिलेल्या अहवालानुसार परवानाधारकांना ५६००० रूपये मासिक वेतन द्यावे, तसेच वाढलेल्या महागाईनुसार फरकाची रक्कमही मिळावी, केरोसिनचा कोटा कपात केल्यामुळे विक्रेत्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत असून, शासनाने राज्यातील हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे पुनवर्सन करून त्यांना मानधन देण्यात यावे, केरोसिन परवाना धारकांना अनुदानित गॅस वितरणाचे पुर्ण कामकाज देण्यात यावे, शासनाने राज्यात शिधापत्रिकाधारकांना कोठेही कुठल्याही रास्त धान्य दुकानात धान्य मिळावे म्हणून पोर्टबिलीटीची योजना सुरू केली आहे. त्यामुळे परवानाधारकांवर अन्याय होणार असून, शाासनाने कमीशन वाढ करूनही त्याचा फायदा होणार नाही. ही योजना युद्धपातळीवर राबविणार असेल तर परवानाधारकांना वेतनश्रेणी, शासकीय कर्मचाºयाचादर्जा प्राप्त करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या ११ मार्च रोजी वर्धा येथे राज्यस्तरीय बैठक घेवून त्यात रणनीती ठरविली जाणार आहे. या मेळाव्यास पुण्याचे शहाजी लोखंडे, सोलापुरचे बाबुराव ममाने, जळगावचे जमनादास भाटीया, नगरचे देवीदास देसाई, गणपत डोळसे पाटील, प्रविण जैन, निवृत्ती कापसे, गिरीष कुलकर्णी, परशुरामअहिरे, सुभाष शिरोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक