शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्कसाठी रेशन दुकानदारांनाही घ्यावा लागतोय मानोरीत उंच जागेचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:42 IST

रोहन वावधाने मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता,

रोहन वावधानेमानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे. ऑनलाइन कामांमुळे पारदर्शकता निर्माण व्हावी या हेतूने सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आला आहे, त्यामुळे रेशन दुकानातील कामे देखील सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत; मात्र मानोरीत नेटवर्क नीट मिळत नसल्याने मानोरीतील रेशन दुकानदारांना दुकानापासून जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या छतावर जाऊन उंच जागेचा आसरा घेत आपले ऑनलाइन कामकाज पूर्ण करावे लागत आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून मानोरी बुद्रुक येथे कोणत्याही मोबाईल कंपन्यांच्या कार्डला नेटवर्क मिळत नसून मोबाईलधारकांनी मानोरी येथे नवीन टॉवर उभारण्याची अनेकदा मागणी केली आहे. कोणतीही नेटवर्क कंपनी त्याकडे लक्ष देत नसून, संबंधित कंपनीच्या सुस्त कारभारामुळे अद्यापही येथील नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मोबाईल धारकांनी सर्वच कंपन्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.मोबाईल कंपन्यांच्या डोळेझाकपणामुळे काही दिवसांपूर्वी मानोरीतील काही तरुणांकडून सर्व सिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता, मात्र त्या मागणीवर एकाही मोबाईल कंपनीने प्रतिक्रिया न दिल्यामुळे ऑनलाइन कामांच्या अडचणीत अजूनच वाढ होताना दिसत आहे. सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आलेला आहे, मात्र मानोरी बुद्रुक परिसरात मागील चार वर्षांपासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी मागणी करून देखील कोणत्याही कंपनीचा टॉवर मानोरीत उभा करण्यास कंपनी तयारी दाखवत नाही. त्यामुळे मोबाईलधारक प्रचंड नाराज आहेत.नेटवर्कअभावी महागडे रिचार्ज वाया जात असल्याची माहिती मोबाइलधारकांनी दिली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठीही सध्या नेटवर्कची अत्यंत गरज भासत असते, विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी उंच जागेचा आसरा घ्यावा लागत आहे. नेटवर्क अभावी ग्रामपंचायतीचे देखील अनेक ऑनलाईन कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी शेजारच्या देशमाने आणि मुखेड येथील ग्रामपंचायतमध्ये जाऊन कामकाज पूर्ण करावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीने का होईना मानोरी बुद्रुक येथे पाहणी करून नवीन टॉवर उभा करून नेटवर्कचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मोबाईलधारक, ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार