शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेटवर्कसाठी रेशन दुकानदारांनाही घ्यावा लागतोय मानोरीत उंच जागेचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:42 IST

रोहन वावधाने मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता,

रोहन वावधानेमानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा मागील तीन ते चार वर्षांपासून बोजवारा उडाला असून, नेटवर्कचा तिढा सुटता सुटत नसल्याने आता मानोरीत रेशन दुकानदारांना देखील नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला असल्याने रेशन वितरण करण्यास नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे. ऑनलाइन कामांमुळे पारदर्शकता निर्माण व्हावी या हेतूने सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आला आहे, त्यामुळे रेशन दुकानातील कामे देखील सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत; मात्र मानोरीत नेटवर्क नीट मिळत नसल्याने मानोरीतील रेशन दुकानदारांना दुकानापासून जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या छतावर जाऊन उंच जागेचा आसरा घेत आपले ऑनलाइन कामकाज पूर्ण करावे लागत आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून मानोरी बुद्रुक येथे कोणत्याही मोबाईल कंपन्यांच्या कार्डला नेटवर्क मिळत नसून मोबाईलधारकांनी मानोरी येथे नवीन टॉवर उभारण्याची अनेकदा मागणी केली आहे. कोणतीही नेटवर्क कंपनी त्याकडे लक्ष देत नसून, संबंधित कंपनीच्या सुस्त कारभारामुळे अद्यापही येथील नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मोबाईल धारकांनी सर्वच कंपन्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.मोबाईल कंपन्यांच्या डोळेझाकपणामुळे काही दिवसांपूर्वी मानोरीतील काही तरुणांकडून सर्व सिमकार्डची होळी करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता, मात्र त्या मागणीवर एकाही मोबाईल कंपनीने प्रतिक्रिया न दिल्यामुळे ऑनलाइन कामांच्या अडचणीत अजूनच वाढ होताना दिसत आहे. सर्वत्र ऑनलाइन कामांना वेग आलेला आहे, मात्र मानोरी बुद्रुक परिसरात मागील चार वर्षांपासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी मागणी करून देखील कोणत्याही कंपनीचा टॉवर मानोरीत उभा करण्यास कंपनी तयारी दाखवत नाही. त्यामुळे मोबाईलधारक प्रचंड नाराज आहेत.नेटवर्कअभावी महागडे रिचार्ज वाया जात असल्याची माहिती मोबाइलधारकांनी दिली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठीही सध्या नेटवर्कची अत्यंत गरज भासत असते, विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी उंच जागेचा आसरा घ्यावा लागत आहे. नेटवर्क अभावी ग्रामपंचायतीचे देखील अनेक ऑनलाईन कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी शेजारच्या देशमाने आणि मुखेड येथील ग्रामपंचायतमध्ये जाऊन कामकाज पूर्ण करावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीने का होईना मानोरी बुद्रुक येथे पाहणी करून नवीन टॉवर उभा करून नेटवर्कचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मोबाईलधारक, ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार