शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रेशनमध्ये तांदळाचा खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:38 IST

मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाशिक : मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेशनच्या तांदळासाठी शिधापत्रिकाधारकांकडून पुरवठा विभागाला तगादा लावण्यात येत असतानाही अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.  नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख शिधापत्रिका-धारकांसाठी दरमहा सुमारे ३०४४९ क्विंटल तांदूळ शासनाकडून अन्नधान्य महामंडळामार्फत पुरविण्यात येतो. साधारणत: प्रत्येक महिन्याचे धान्य एक महिना अगोदरच अन्नधान्य महामंडळाकडून उचल करून ते रेशन दुकानदारांना वाटपासाठी देण्याची पद्धत अवलंबिण्यात आलेली आहे. परंतु मे महिन्यात मनमाडच्या अन्नधान्य महामंडळाकडे तांदळाचा अल्प पुरवठाच करण्यात आला. १६ मे रोजी फक्त दहा ट्रक तांदूळ भरण्यात आल्यानंतर अन्नधान्य महामंडळाने माल शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यामुळे जेमतेम रेशन दुकानदारांनाच तांदळाचा पुरवठा करण्यात आला. नाशिक शहरातील २३० रेशन दुकानदारांपैकी निम्म्याहून अधिक दुकानदारांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत तांदूळ मिळालेला नाही. परिणामी शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला रेशन दुकानदारांना सामोरे जावे लागले आहे. तांदळासाठी रेशन दुकानदारांनी गेल्या महिन्यातच चलने भरली असून, चालू महिन्याचे धान्य वाटपासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. अशातच रमजान महिना सुरू असल्याने मुस्लीम धर्मीयांना उपवास सोडण्यासाठी भात आवश्यक असल्यामुळे त्यांच्याकडून तांदळासाठी तगादा लावला जात आहे. गेल्या दोन दिवसांत शेकडो दुकानदारांनी धान्य वितरण अधिकाºयांकडे तोंडी, लेखी मागणी नोंदविली असून, अद्यापही तांदूळ मिळालेला नसल्याने रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये खटके उडू लागले आहेत.जूनचा तांदूळही नाहीजून महिन्याचा तांदूळ अन्नधान्य महामंडळातून उचलण्यासाठी अंतिम मुदत ३१ मे असून, अद्यापही धान्य वाहतुकदाराला अन्नधान्य महामंडळाकडून तांदूळ मिळालेला नाही. या संदर्भात वाहतूक प्रतिनिधीने १७ जून रोजीच अन्नधान्य महामंडळाला पत्र पाठविले असून, तांदूळ न मिळाल्यास तो व्यपगत (लॅप्स) होण्याची भीती व्यक्त केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय