शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

रेशनमध्ये तांदळाचा खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:38 IST

मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाशिक : मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेशनच्या तांदळासाठी शिधापत्रिकाधारकांकडून पुरवठा विभागाला तगादा लावण्यात येत असतानाही अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.  नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख शिधापत्रिका-धारकांसाठी दरमहा सुमारे ३०४४९ क्विंटल तांदूळ शासनाकडून अन्नधान्य महामंडळामार्फत पुरविण्यात येतो. साधारणत: प्रत्येक महिन्याचे धान्य एक महिना अगोदरच अन्नधान्य महामंडळाकडून उचल करून ते रेशन दुकानदारांना वाटपासाठी देण्याची पद्धत अवलंबिण्यात आलेली आहे. परंतु मे महिन्यात मनमाडच्या अन्नधान्य महामंडळाकडे तांदळाचा अल्प पुरवठाच करण्यात आला. १६ मे रोजी फक्त दहा ट्रक तांदूळ भरण्यात आल्यानंतर अन्नधान्य महामंडळाने माल शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यामुळे जेमतेम रेशन दुकानदारांनाच तांदळाचा पुरवठा करण्यात आला. नाशिक शहरातील २३० रेशन दुकानदारांपैकी निम्म्याहून अधिक दुकानदारांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत तांदूळ मिळालेला नाही. परिणामी शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला रेशन दुकानदारांना सामोरे जावे लागले आहे. तांदळासाठी रेशन दुकानदारांनी गेल्या महिन्यातच चलने भरली असून, चालू महिन्याचे धान्य वाटपासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. अशातच रमजान महिना सुरू असल्याने मुस्लीम धर्मीयांना उपवास सोडण्यासाठी भात आवश्यक असल्यामुळे त्यांच्याकडून तांदळासाठी तगादा लावला जात आहे. गेल्या दोन दिवसांत शेकडो दुकानदारांनी धान्य वितरण अधिकाºयांकडे तोंडी, लेखी मागणी नोंदविली असून, अद्यापही तांदूळ मिळालेला नसल्याने रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये खटके उडू लागले आहेत.जूनचा तांदूळही नाहीजून महिन्याचा तांदूळ अन्नधान्य महामंडळातून उचलण्यासाठी अंतिम मुदत ३१ मे असून, अद्यापही धान्य वाहतुकदाराला अन्नधान्य महामंडळाकडून तांदूळ मिळालेला नाही. या संदर्भात वाहतूक प्रतिनिधीने १७ जून रोजीच अन्नधान्य महामंडळाला पत्र पाठविले असून, तांदूळ न मिळाल्यास तो व्यपगत (लॅप्स) होण्याची भीती व्यक्त केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय