शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हजार मुलांमागे ९६५ मुलींचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदरवाढीसाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हा विषय सामाजिक पातळीवर नेल्यामुळे मुलींना जन्मास न ...

गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदरवाढीसाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हा विषय सामाजिक पातळीवर नेल्यामुळे मुलींना जन्मास न घालण्याबाबतची मानसिकता बदललत चालली आहे. मुलींना जन्मास घालणे म्हणजे माेठे आव्हान असे समजून आजवर मुलींना गर्भातच नष्ट करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. त्यातून मुलींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने परिणामी सामाजिक असमतोल होण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. परंतु वेळीच विषयाचे गांभीर्य समाजाचे लक्षात आल्याने आता परिस्थिती बदलत चालली आहे. अर्थात त्यासाठी शासनाला कायद्याचाही आधार घ्यावा लागला आहे. गरोदर महिलांची गर्भलिंग चाचणी करणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रोत्साहनपर योजनाही शासनाने सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर कन्यादान योजना, सुवर्णकन्या अशा आर्थिक फायद्याच्या योजनांमुळे पालकांचा मुलींना जन्म घालण्याकडे कल वाढला आहे. एवढेच नव्हे तर मुलींना माता-पित्याच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदाही करण्यात आल्यामुळे मुलींना जन्म देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता ही वाढ समाधानकारक मानली जात असून, सन २०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे ९३५ मुलींचे प्रमाण होते. आता तेच प्रमाण ९६५ इतके झाले आहे.

-----

मोफत लसीकरणामुळे जन्मदरात वाढ

शासनाने मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये मोफत लसीकरणाचाही समावेश आहे. मुलांचा जन्म होताच त्यांचे लसीकरण केले जाते. त्यात बीसीजी, हिपटॉयटीस, कावीळ, गोवर प्रतिबंधक लसी दिल्या जातात. त्यातून मुलांची प्रतिकारशक्ती वाढीस लागून रोगराईपासून मुक्ती मिळते.

-------

गरोदरपणापासूनच मातांची काळजी

तीन महिन्यांच्या गरोदरपणापासूनच आरोग्य विभागाकडून महिलांची काळजी घेतली जाते. त्यांना वेळोवेळी लसीकरण, औषधे, पोषण आहार व नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्याचबरोबर सुरक्षित बाळंतपण केल्यानंतर स्तनदा माता व नवजात बाळाची काळजी घेतली जाते.

------------------

मुलगीदेखील वंशाचा दिवा असल्याची समाजात रूजत चाललेली भावना व शासनाकडून मुलींच्या जन्मासाठी दिले जात असलेले प्रोत्साहन पाहता मुलींच्या जन्मदरात सातत्याने होत असलेली वाढ समाधानकारक आहे. मुले व मुलींचे प्रमाण समान झाल्यावरच खऱ्या अर्थाने स्री-पुरुष समानता येईल.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी