शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

कळवण : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ व कळवणचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटीसारख्या दुय्यम प्रश्नांमध्ये व्यस्त आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षांत पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८० रुपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, भारनियमन कमी होताना दिसतनाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य उपाययोजना  आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, भाजपा सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अद्यापही घोळच सुरू आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे व महागाई कमी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जितेंद्र वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण बाजार समितीचे संचालक, शिवसेनेचे गणप्रमुख शीतलकुमार आहिरे, तालुका संघटक संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, विभागप्रमुख अंबादास जाधव, संजय रौंदळ, किशोर पवार, ललित आहेर, सचिन पगार, अप्पा बुटे, विनोद मालपुरे, विनोद भालेराव, किशोर ततार आदी उपस्थित होते.