शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

कळवण : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ व कळवणचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटीसारख्या दुय्यम प्रश्नांमध्ये व्यस्त आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षांत पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८० रुपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, भारनियमन कमी होताना दिसतनाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य उपाययोजना  आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, भाजपा सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अद्यापही घोळच सुरू आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे व महागाई कमी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जितेंद्र वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण बाजार समितीचे संचालक, शिवसेनेचे गणप्रमुख शीतलकुमार आहिरे, तालुका संघटक संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, विभागप्रमुख अंबादास जाधव, संजय रौंदळ, किशोर पवार, ललित आहेर, सचिन पगार, अप्पा बुटे, विनोद मालपुरे, विनोद भालेराव, किशोर ततार आदी उपस्थित होते.