शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ वृक्षांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:32 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.

इंदिरानगर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.  उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात. वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्ष मित्रमंडळाची स्थापना केली. त्याकाळी बापू बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिक केरकचरा टाकत असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. या मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला अन् त्यासाठी सापुतारा, ब्रह्मगिरी यांसारख्या जिल्ह्यातील विविध जंगले व डोंगर दऱ्यातून दुर्मिळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून आज वृक्ष मोठे झाले आहेत. या वृक्षांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या बुंध्याजवळ चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षाची माहिती लिहिण्यात आली होती त्यामुळे आबालवृद्धांना त्यांची ओळख होत होती. परंतु आता सदर चबुतरे हटविण्यात आल्याने दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या उद्यानाची योग्य निगा राखण्याबरोबरच त्यांची ओळख करून देणारे माहिती फलक लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :forestजंगल