शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

तांडा वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:12 IST

लभान तांडा वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने मागील महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ममदापूर : लभान तांडा वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने मागील महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे गावातील कुठल्याही विहिरीत पाणी नाही. तसेच ग्रामपंचायत मालकीची विहीर कोरडी असल्याने जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लभान ताडा वाडी-वस्तीकडे सगळ्या यंत्रणेचे लक्ष कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी दहा ते बारा दिवसांपासून टॅँकर चालू आहे, परंतु ताडा वस्तीवर टॅँकर चालू होण्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस वाट पहावी लागणार असल्याचे ग्रामसेवक भगवान गायके यांनी सांगितले.  पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी असून, आठ ते दहा दिवसांनंतर टॅँकर ताडा वस्तीकडे सुरू होईल, असे सांगितले जाते.परिसरातील विहिरींना पाणी कमी असल्याने बऱ्याच ठिकाणांहून रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. टॅँकर मागणी करून दीड महिना उलटला तरीदेखील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणीदेखील केलेली नसून प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला की काय? असा प्रश्न ममदापूर येथील ग्रामस्थांना पडला आहे.ममदापूर ताडा वस्तीवरील लभान समाजाचे लोक दिवाळीच्या नंतर ऊस तोडीसाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यांकडे जातात व ते सध्या ऊस तोडी करून आपले कुटुंब व जनावरे घेऊन आल्याने व पिण्यासाठी पाणी नसल्याने या जनावरांना कवडीमोल भावात विकण्याची पाळी येथील लोकांवर आली आहे. गावात दररोज टॅँकर येत असून, तो टॅँकर वाडी-वस्तीवर पाठवावा म्हणजे गावाबरोबर वस्तीवरच्या नागरिकांनादेखील पाणी मिळेल. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना पिण्याच्या पाण्याचा टॅँकर कधी सुरू होणार अशी विचारणा ताडा गावात सुरू झाली आहे. आता वाडी-वस्तीवर उद्या सकाळी टॅँकर येणार एवढेच तोंडी सांगण्यात येते, मग उद्या उगवणार तरी केव्हा ? हाच प्रश्न येथील लभान बाधवांना पडला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने केव्हाही हंडा मोर्चा किंवा रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थ पुकारू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई