शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:00 IST

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.या गावात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिलावर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावाला तात्काळ टँकर मंजूर केला जावा अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.चालू वर्षी संपूर्ण तालुक्याभरात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यामुळे तळाला गेल्या असून या गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी ह्या गावाचीही पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर तसेच गावातील कूपनलिका ह्या पूर्णपणे आटल्याने या गावापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात रहाणारे बहुतांश नागरिक हे शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला सध्यस्थीतीत आपली रोजीरोटी बुडवुन हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षापासुन या गावाला चालू असलेला टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून गावाला सद्यस्थितीत पाणीटचांईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षापासुन बंद झालेला टँकंर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीला करावी लागली असून ग्रामपचांयतीच्या वतीने बागलाण पचांयत समितीकडे टँकंर मागणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजुर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे गावासाठी दहा वर्षांपासून चालू असलेला टँकर बंद झाला होता.गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असुन या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहीरीच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय उरलेला नाही. या करीता शासनाने वेळीच सहानुभुतीपुर्वक विचार करुन गावासाठी पाण्याचे टँकर चालुकरावे लागत आहे.