शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:00 IST

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.या गावात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिलावर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावाला तात्काळ टँकर मंजूर केला जावा अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.चालू वर्षी संपूर्ण तालुक्याभरात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यामुळे तळाला गेल्या असून या गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी ह्या गावाचीही पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर तसेच गावातील कूपनलिका ह्या पूर्णपणे आटल्याने या गावापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात रहाणारे बहुतांश नागरिक हे शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला सध्यस्थीतीत आपली रोजीरोटी बुडवुन हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षापासुन या गावाला चालू असलेला टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून गावाला सद्यस्थितीत पाणीटचांईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षापासुन बंद झालेला टँकंर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीला करावी लागली असून ग्रामपचांयतीच्या वतीने बागलाण पचांयत समितीकडे टँकंर मागणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजुर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे गावासाठी दहा वर्षांपासून चालू असलेला टँकर बंद झाला होता.गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असुन या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहीरीच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय उरलेला नाही. या करीता शासनाने वेळीच सहानुभुतीपुर्वक विचार करुन गावासाठी पाण्याचे टँकर चालुकरावे लागत आहे.