शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:00 IST

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

विरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसतांना दिसून येत आहे.या गावात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसह गावातील अन्य जलस्रोतही पूर्णपणे आटल्याने गावातील महिलावर्गाला हडांभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे गावाला तात्काळ टँकर मंजूर केला जावा अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे केली आहे.चालू वर्षी संपूर्ण तालुक्याभरात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना यामुळे तळाला गेल्या असून या गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील तरसाळी ह्या गावाचीही पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर तसेच गावातील कूपनलिका ह्या पूर्णपणे आटल्याने या गावापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात रहाणारे बहुतांश नागरिक हे शेती व मोलमजुरी करणारे असल्याने महिला वर्गाला सध्यस्थीतीत आपली रोजीरोटी बुडवुन हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.पाणीप्रश्नावरून सत्तांतर झालेल्या या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पदाधिकाºयांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गत दहा ते बारा वर्षापासुन या गावाला चालू असलेला टँकर बंद होण्यास मदत झाली होती. मात्र अपºया पर्जन्यमानाचा फटका या गावाला पुन्हा एकदा बसला असून गावाला सद्यस्थितीत पाणीटचांईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे. यामुळे चार वर्षापासुन बंद झालेला टँकंर पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीला करावी लागली असून ग्रामपचांयतीच्या वतीने बागलाण पचांयत समितीकडे टँकंर मागणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.शासन स्तरावरून गावासाठी लवकरात लवकर टँकर मंजुर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील चार वर्षांच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरल्यामुळे गावासाठी दहा वर्षांपासून चालू असलेला टँकर बंद झाला होता.गावासाठी नुकतीच पेयजल योजनाही मंजूर झाली असुन या कामालाही लवकरच सुरवात होणार आहे. परंतु यावर्षी अपुºया पर्जन्यमानामुळे गाव परिसरातील विहीरीच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी टँकरशिवाय गावाला कोणताही पर्याय उरलेला नाही. या करीता शासनाने वेळीच सहानुभुतीपुर्वक विचार करुन गावासाठी पाण्याचे टँकर चालुकरावे लागत आहे.