शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

रामनाम जपाची अखंड भक्तिसाधना

By admin | Updated: February 7, 2017 23:08 IST

तीन हजार साधकांचा उपक्रम : श्री ब्रह्मचैतन्य उपासना मंदिरात सेवा

मुकुंद बाविस्कर : नाशिकआधुनिक तंत्र आणि यंत्र युगात ‘रामनाम’ मंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना आयुष्याच्या प्रारंभापासून ते अखेर श्वासापर्यंतच ‘रामनाम’च मनुष्याला तारून नेते असे सांगत अखंड भारतभ्रमण करीत रामनाम जपाचे महात्म्य पटवून देणारे अलौकिक योगीपुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासण्याचे कार्य गंगापूररोडनजीकच्या चैतन्यनगरात अखंडपणे सुरू आहे. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता या उपासना यज्ञात रोज सहभाग घेत आहेत.  योगीराज तुकामाई महाराज यांचे शिष्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची बुधवारी (दि. ८) जयंती असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे धार्मिक व आध्यात्मिक कार्य अलौकिक असून, त्यांनी देशभरात हजारो मंदिरे उभारून शेकडो  मंदिरांचा जीर्णोद्धारदेखील केला. नाशिकच्या काळाराम मंदिरालाही महाराजांनी भेट देऊन प्रवचन केले होते. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक कार्यातही त्यांनी पुढाकार घेतला.  दुष्काळात भुकेल्यांसाठी अन्नछत्र उघडले. आज शंभर वर्षांनंतरही त्यांच्या कार्याची परंपरा लाखो शिष्य, साधक, उपासक आणि अनुयायी यांच्याकडून सुरू आहे. नाशिक शहरात गंगापूररोडलगत गोदाकाठावर चैतन्यनगरात एक तपापूर्वी श्रीसदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज उपासना केंद्र व मंदिराची स्थापना करण्यात आली असून, केंद्रामार्फत भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, पालखी मिरवणूक व महाप्रसाद आदि धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात.  याशिवाय आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, अन्नदान, व्याख्यान आदि सामाजिक कार्यदेखील सुरू असते. कोणत्याही कर्मकांडात अडकण्याऐवजी परमेश्वराचा नामजप हाच सर्व मोठा यज्ञ आणि साधना आहे. ही ब्रह्मचैतन्य महाराजांची  शिकवण आचरणात आणत या भागातील नव्हे तर शहरातील सुमारे तीनशे कुटुंबातील हजार साधकांकडून रामनाम जपाचा अखंड यज्ञ सुरू आहे.