शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रामकुंडाचे पुन्हा झाले विस्तारीकरण

By admin | Updated: August 14, 2015 00:19 IST

सीताकुंडाची भिंत तोडली : अरुणा कुंड बुजवल्याने पुरोहित संतप्त, स्थानिक नागरिकांचा आक्षेप डावलून कार्यवाही

नाशिक : कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या स्नानासाठी रामकुंड आणि सीताकुंड यांच्यात असलेली भिंत तोडून महापालिकेने ते प्रशस्त केले असून, त्यामुळे एकाच वेळी शेकडो साधू स्नान करू शकतील. तथापि, महापालिकेने दोन कुंडांचे अस्तित्व नष्ट करण्याच्या प्रकारामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. इतकेच नव्हे तर रामकुंडातील अरुणा कुंड महापालिकेने बुजवल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सकाळी तीन तास पुरोहितांनी नदीपात्रात उतरून हे कुंड खुले केले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी ही कामे रोखण्याची मागणी केली आहे. पर्वणी तोंडावर असताना महापालिकेने आता प्रलंबित कामांना घाईघाईने हात घातला आहे. गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००२-०३ मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी रामकुंड परिसरातील नऊ कुंडांचे एकत्रिकरण करून रामकुंडाचे विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता रामकुंडालगत असलेल्या सीताकुंडामध्ये असलेली भिंत तोडण्यास बुधवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर भल्या पहाटे हे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी कालरात्रीपासून गांधी तलावापासून सीताकुंडापर्यंत याचदरम्यान सकाळी रामकुंडावर आलेल्या पुरोहितांना रामकुंडाखाली असलेल्या पुरातन गोमुखाच्या ठिकाणी असलेले अरुणा कुंड महापालिकेने गाळ टाकून बुजवल्याचे आढळले. त्यामुळे पुरोहित संतप्त झाले. सर्व पुरोहितांनी रामकुंडात उतरून बुजवलेला नाला खुला केला. रामशेजवरून उगम पावलेली अरुणा नदी रामकुंडात गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे गोदावरीचे महत्त्व असून, हे महत्त्वच नष्ट केल्याचा आरोप पुरोहितांनी केला आहे. सदरचा प्रकार घडत नाही तोच महापलिकेने रामकुंड आणि सीताकुंडाच्या दरम्यान असलेली भिंत तोडली. येथील नदी कुंड पुनरुज्जीवनाचा लढा देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गोदावरी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी त्यास विरोध केला. रामकुंड हे पुरातन असून, त्यासंदर्भात कोणतीही कृती करताना पुरातत्व खात्याची मंजुरी घेण्याची त्यांची मागणी होती. मनपाने दुर्लक्ष केल्याने आता न्यायालयीन लढाईत पालिकेच्या कारभाराला आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मनपाने रामकुंड आणि सीताकुंडाचे एकत्रिकरण मागील कुंभमेळ्यातच केले होते. त्यानंतर २००५ मध्ये रामकुंड शुद्धीकरणासाठी केंद्र सुरू करण्यात आले त्यावेळी शुद्धीकरणप्रक्रिया सोपी व्हावी यासाठी मनपाने ही भिंत घातली होती. आता हीच भिंत काढून घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली.