शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रामकुंडाचे पुन्हा झाले विस्तारीकरण

By admin | Updated: August 14, 2015 00:19 IST

सीताकुंडाची भिंत तोडली : अरुणा कुंड बुजवल्याने पुरोहित संतप्त, स्थानिक नागरिकांचा आक्षेप डावलून कार्यवाही

नाशिक : कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या स्नानासाठी रामकुंड आणि सीताकुंड यांच्यात असलेली भिंत तोडून महापालिकेने ते प्रशस्त केले असून, त्यामुळे एकाच वेळी शेकडो साधू स्नान करू शकतील. तथापि, महापालिकेने दोन कुंडांचे अस्तित्व नष्ट करण्याच्या प्रकारामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. इतकेच नव्हे तर रामकुंडातील अरुणा कुंड महापालिकेने बुजवल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सकाळी तीन तास पुरोहितांनी नदीपात्रात उतरून हे कुंड खुले केले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी ही कामे रोखण्याची मागणी केली आहे. पर्वणी तोंडावर असताना महापालिकेने आता प्रलंबित कामांना घाईघाईने हात घातला आहे. गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००२-०३ मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी रामकुंड परिसरातील नऊ कुंडांचे एकत्रिकरण करून रामकुंडाचे विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता रामकुंडालगत असलेल्या सीताकुंडामध्ये असलेली भिंत तोडण्यास बुधवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर भल्या पहाटे हे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी कालरात्रीपासून गांधी तलावापासून सीताकुंडापर्यंत याचदरम्यान सकाळी रामकुंडावर आलेल्या पुरोहितांना रामकुंडाखाली असलेल्या पुरातन गोमुखाच्या ठिकाणी असलेले अरुणा कुंड महापालिकेने गाळ टाकून बुजवल्याचे आढळले. त्यामुळे पुरोहित संतप्त झाले. सर्व पुरोहितांनी रामकुंडात उतरून बुजवलेला नाला खुला केला. रामशेजवरून उगम पावलेली अरुणा नदी रामकुंडात गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे गोदावरीचे महत्त्व असून, हे महत्त्वच नष्ट केल्याचा आरोप पुरोहितांनी केला आहे. सदरचा प्रकार घडत नाही तोच महापलिकेने रामकुंड आणि सीताकुंडाच्या दरम्यान असलेली भिंत तोडली. येथील नदी कुंड पुनरुज्जीवनाचा लढा देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गोदावरी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी त्यास विरोध केला. रामकुंड हे पुरातन असून, त्यासंदर्भात कोणतीही कृती करताना पुरातत्व खात्याची मंजुरी घेण्याची त्यांची मागणी होती. मनपाने दुर्लक्ष केल्याने आता न्यायालयीन लढाईत पालिकेच्या कारभाराला आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मनपाने रामकुंड आणि सीताकुंडाचे एकत्रिकरण मागील कुंभमेळ्यातच केले होते. त्यानंतर २००५ मध्ये रामकुंड शुद्धीकरणासाठी केंद्र सुरू करण्यात आले त्यावेळी शुद्धीकरणप्रक्रिया सोपी व्हावी यासाठी मनपाने ही भिंत घातली होती. आता हीच भिंत काढून घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली.